पुणे

नंतरचा लढा गांधी मार्गाने नसेल

CD

आंबेठाण, ता. ७ : ‘‘आम्हा शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा लढा हा केवळ मतांसाठी नसून, तो सर्वसामान्य लोकांच्या वेदना थांबविण्यासाठी आहे. मागील सहा महिन्यांत जवळपास १२०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आजपर्यंत आम्ही गांधी मार्गाने आंदोलन केले असून, २ ऑक्टोबरनंतर आमचा लढा हा गांधी मार्गाने नसेल,’’ असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी आंबेठाण (ता. खेड) येथे दिला.
शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी कडून यांनी यापूर्वी अन्नत्याग आंदोलन, पदयात्रा, चक्काजाम आंदोलन केले असून, यापुढे पाच शेतकरी हक्क परिषद घेतल्या जाणार आहेत. यातील पहिली हक्क परिषद आंबेठाण येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रदेश संघटनेचे संस्थापक सदस्य श्‍यामराव पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष नंदकिशोर लोखंडे, शरद जोशी विचार मंचाचे राष्ट्रीय निमंत्रक अध्यक्ष विठ्ठल राजे पवार, मृण्मय काळे, संतोष मांडेकर, शांताराम चव्हाण, अनिल भांडवलकर, बाळासाहेब वर्पे, संतोष मांडेकर, गीताबाई मांडेकर, राजश्री गायकवाड, कांचन मांडेकर, बाजीराव लोखंडे, गजानन गांडेकर, दशरथ काचोळे, महेंद्र नाईकनवरे आदी उपस्थित होते.

यावेळी केलेल्या प्रमुख मागण्या
शेतकऱ्‍यांना संपूर्ण कर्जमुक्ती, सर्व प्रकारच्या शेतमालाला किमान हमीभाव, गायीच्या दुधाला प्रतिलिटर ४८ रुपये व म्हैस दुधाला प्रतिलिटर ५८ रुपये, असा दर मिळावा, सन २०२५-२०२६ च्या ऊस गाळप हंगामासाठी प्रति टनास उसाला ४४०० रुपये दर मिळावा, कांदा उत्पादक शेतकऱ्‍यांना किमान प्रति क्विंटलला २५०० रुपये दर मिळावा, दिव्यांगाना ६ हजार रुपये पेन्शन व मोफत घरे, ५५ वय वर्षानंतर शेतकऱ्‍यांना किमान १० हजार रुपये पेन्शन मिळावी, मेंढपाळ व मच्छीमारांना संरक्षण, बेरोजगार, युवकांना नोकऱ्या मिळाव्यात, शेतकऱ्‍यांच्या उसाच्या थकीत एफआरपीवर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे १५ टक्के व्याज भरपाई हंगाम सुरू होण्यापूर्वी मिळावी.

शरद जोशी यांच्या निवासस्थानी भेट
यावेळी बच्चू कडू यांनी स्व. शरद जोशी यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि त्यांच्या प्रतिमेला नमन केले. परंतु, त्यांच्या राहत्या घराची आणि परिसराची दुर्दशा पाहून त्यांनी खंत व्यक्त केली. पुढील काळात सर्वांना एकत्रित आणून त्यांचे स्मारक करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सरकारपेक्षा आम्हा लोकांची मानसिकता खराब आहे. आम्हाला एक दिवससुद्धा या स्मृतीस्थळी जाऊन श्रमदान करावे वाटत नाही ही शरमेची बाब आहे, असे ते म्हणाले.

‘चाकणची वाहतूककोंडी परवडत नाही’
चाकणला पायी येणे परवडले असते, येथे पायी गाडीने येणे परवडत नाही, असे कडू यांनी चाकणच्या वाहतूककोंडी बद्दल सांगितले. आजपर्यंत सगळीकडे वाहतूककोंडी पाहिली, पण चाकणच्या वाहतूककोंडीने सर्व उच्चांक मोडले आहेत, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

I.N.D.I.A Alliance Meeting Update: राहुल गांधींच्या निवासस्थानी पार पडलेल्या I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीत झाले मोठे निर्णय!

Maharashtra Election Commission: निवडणुकीत घोळ झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपावर, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने पाठवलं पत्र अन् म्हटलं...

UPI Down! गुग-पे, फोन-पे, पेटीएम सेवा कोलमडली, नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

kapil sharma : कपिल शर्माच्या कॅनाडातील कॅफेवर पुन्हा गोळीबार....लॉरेंस बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी...पुढचा हल्ला मुंबईत करण्याचीही धमकी

Narali Pournima and Gauri Visarjan Holiday : राज्य सरकारने नारळीपौर्णिमा अन् ज्येष्ठगौरी विसर्जनानिमित्त स्थानिक सुट्टी केली जाहीर, मात्र...

SCROLL FOR NEXT