
Maharashtra Election Commission letter to Rahul Gandhi: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरूवारी पुन्हा एकदा बिहारमधील मतदार यादी पूनसर्वेक्षणावरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं आहे. तसेच, यावेळी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याचाही पुन्हा एकदा आरोप केला आहे. एवढंच नाहीतर अनेक निवडणुकीत एका व्यक्तीने तीन वेळा मतदान केल्याचंही त्यांनी म्हटलं. राहुल गांधींच्या या आरोपानंतर आता महाराष्ट्र निवडणूक आयोगाने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
राहुल गांधी म्हणाले की, संविधानाची खरी ताकद म्हणजे मतदान आहे. पण निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धीनंतर योग्य व्यक्ती मतदान करते आहे का? अनेक मतदार यादीत बनावट मतदारांचा समावेश करण्यात आला का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित होतो आहे.
तर राहुल गांधींच्या या आरोपानंतर महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहून मतदार नोंदणी नियम, १९६० च्या नियम २०(३)(ब) अंतर्गत संबंधित मतदारांच्या नावांसह स्वाक्षरी केलेले घोषणापत्र आणि शपथपत्र सादर करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून आवश्यक कार्यवाही सुरू करता येईल.
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. पत्रात असे म्हटले आहे की, "आज झालेल्या पत्रकार परिषदेत तुम्ही अपात्र मतदारांचा समावेश आणि पात्र मतदारांना मतदार यादीतून वगळण्याबद्दल उल्लेख केल्याचे कळले आहे. तुम्हाला विनंती आहे की अशा मतदारांच्या नावांसह संलग्न घोषणापत्र/प्रतिज्ञापत्र स्वाक्षरी केल्यानंतर परत पाठवावे, जेणेकरून आवश्यक कार्यवाही सुरू करता येईल."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.