पुणे

आध्यात्मिक विचार जगात श्रेष्ठ : मुनगंटीवार आध्यात्मिक विचार जगात श्रेष्ठ : मुनगंटीवार

CD

आळंदी, ता. २६: ''''जगात मानवता धर्म शिकविणारा भारताचा आध्यात्मिक विचार श्रेष्ठ आहे. या विचारांच्या बळावर भारत जगाला मार्गदर्शन करू शकतो. ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार विजेत्यांनी अशाच आध्यात्मिक विचार गंगेने मानवी मनाचे पोषण केले आहे. त्यांच्याकडून मानव कल्याणाचे कार्य अखंड सुरू राहावे,'''' असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

आळंदी (ता. खेड) येथे राज्य शासनाच्यावतीने संत साहित्य तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा ''ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार २०१९-२०२२'' चे वितरणप्रसंगी ते बोलत होते.
संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पाच लाख रुपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.


दरम्यान, मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते बद्रीनाथ तनपुरे यांना २०१९-२० साठीचा तर स्वामी गोविंददेव गिरी यांना २०२१-२२, महंत बाभूळगांवकर शास्त्री यांना २०२२-२३ साठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बाबा महाराज सातारकर यांना २०२०-२१ पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही.

पुरस्कार प्रदान समारंभाप्रसंगी ‘भक्तीसागर’ या भक्तीमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. गायक समीर अभ्यंकर, आसावरी जोशी, विशाल भांगे यांचा भक्तीगायनाचा कार्यक्रम रंगला. सांस्कृतिक कार्य संचालनालय निर्मित ''अवघा रंग एक झाला'' व ''हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील रॉबीनहूड दत्तोबा भोसले मातोळकर'' या पुस्तकाचे प्रकाशनदेखील यावेळी मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

पुरस्कार वितरणप्रसंगी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालक विभिषण चावरे, पुरस्कार निवड समितीचे सदस्य उपस्थित होते.


कार्यक्रमाला ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ. मुकुंद दातार, शिवाजी महाराज मोरे, राजेश देगलूरकर, आचार्य तुषार भोसले,विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर संस्थानचे अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ, संत ज्ञानेश्वर देवस्थान आळंदीचे विश्वस्त ॲड. विकास ढगे, अभिनेत्री प्रिया बेर्डे आदी उपस्थित होते.


संत ज्ञानेश्वर महाराज वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहितात आणि छत्रपती शिवाजी महाराज पंधराव्या वर्षी स्वराज्यासाठी तलवार हाती घेतात. हे या देशातील अध्यात्म आहे. म्हणूनच जग जिंकणारे इतर परकीय आक्रमक, राजे महाराजे, आपल्यासाठी आदर्श ठरले नाहीत. त्याग, मानवता, सेवा आणि सत्याचा संदेश देणारे राम, कृष्ण, महावीर, छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी निरंतर आदर्श आहेत.
-सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

03260

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT