आळंदी, ता. ८ : येथील ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत प्रतिकात्मक तिरंग्याची राखी बांधून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्ती दृढ करण्यात आली. विद्यालयातील दिव्यांग मुलींनी चौथीच्या विद्यार्थ्यांना राखी बांधून सण उत्साहात साजरा केला.
यावेळी अजय महाराज जोशी, जैन श्रावक संघ लोणावळ्याच्या महिला अध्यक्षा संगीता भुरट, प्रवीण इंटरप्राईजेसचे राजेंद्र सुपेकर, संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, अनिल वडगांवकर, राजेंद्र नहार, प्राचार्य एस. जी. मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे उपस्थित होते.
माउलींच्या मूर्ती पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी प्रास्ताविक केले. अजित वडगांवकर यांनी परंपरेनुसार २५ वर्षे हा उपक्रम प्रशालेत साजरा केला जात असल्याचे सांगितले. नेत्रहीन विभागातील मुली त्यांच्या कुटुंबापासून शिक्षणाकरिता दूर राहतात. या उपक्रमातून त्यांना राखी बांधण्याची संधी मिळते. आपल्या बहिण भावाच्या नात्यातील प्रेम दिवसेंदिवस वाढत जावो तसेच हा सण कोकणात समुद्राची पूजा करून कोळी बांधव आपल्या व्यवसायाला सुरुवात करतात. हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात या दिवसाचे महत्त्व सांगत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन व आभार वैशाली शेळके यांनी केले. सूत्रसंचालन निशा कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वर्षा काळे, प्रतिभा भालेराव, राहुल चव्हाण, गजानन राठोड, गीतांजली रेवडेकर यांचे सहकार्य लाभले.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.