आपटाळे, ता. २९ : केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने दिव्यांग, विधवा, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, श्रावण बाळ आणि लोककलावंत अशा विविध घटकांना मानधन देण्यात येते. मात्र, दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली असून त्यावर त्यांना उदरनिर्वाह करणे अशक्य झाले आहे. हे सर्व घटक वयोवृद्ध, दिव्यांग आणि असंघटित असल्याने शासन दरबारी आवाज उठवणे शक्य होत नाही, असे जुन्नर येथील ज्येष्ठ नागरिक राम लोखंडे यांनी सांगितले.
महागाईचा आलेख सातत्याने चढता आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि सांस्कृतिक विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मानधनाला जोडल्यास त्यांची आर्थिक ओढाताण काही अंशी कमी होण्यास मदत होईल. दरवेळी या प्रश्नांसाठी टाहो फोडण्याची गरज पडणार नाही. अशा घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे राज्य शासनाचे उत्तरदायित्व असून त्यांच्या तुटपुंजा मानधनाला महागाई भत्त्याची तरतूद करून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढून या घटकांना न्याय देण्याची मागणी लोखंडे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.