बावडा, ता. ८ : ऑक्टोबर २०२५ महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे सरसकट विनाअट पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, बावडा परिसरातील नुकसानीसाठी अर्ज केलेल्या सुमारे ९०० शेतकऱ्यांपैकी सुमारे २९० शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष पवन घोगरे, उमेश शिंदे, धनंजय घोगरे, मंगेश आसबे राहुल घोगरे यांनी इंदापूरच्या तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.
बावडा महसूल परिसरातील एकूण ९०० शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई संदर्भात बावडा तलाठी यांच्याकडे अर्ज केले होते. पंचनाम्यासाठी तलाठी २९० शेतकऱ्यांना भरपाई देण्याची तहसीलदारांकडे मागणी वरील शेतकऱ्यांपैकी ५९० शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले आहे व २९० शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांनी तलाठी यांना याबाबत जाब विचारला असता ते उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. वंचित शेतकऱ्यांना अनुदान मिळावे अन्यथा आम्ही बुधवारी (दि. १२) बावडा तलाठी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सुमारे २९० शेतकरी अनुदानापासून कोणत्या आधारे वगळण्यात आले आहेत, अतिवृष्टी बाधित विहिरीचे पंचनामे करण्यात यावेत, शासकीय अनुदानापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.