पुणे

भाताचे मोढे पद्धतीद्वारे साठेसाई परिसरात पेरणी

CD

कोळवण, ता. २८ : मुळशीतील शेतकऱ्यांना मुसळधार पावसामुळे भाताची पुनर्लागवड करताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाली आहे. त्यामुळे भाताचे मोढे (अंकुरीत भात बियाणे) घालून जिथे जागा उपलब्ध होईल व पाणी नसेल, अशा ठिकाणी कुदळीने त्या जागेवर मोड आलेल्या भात बियाण्याची साठेसाई (ता.मुळशी) परिसरात पेरणी केली जात आहे.

मोढे पद्धतीमुळे काही प्रमाणात भात लागवड करता येईल. त्यासाठी देखील पाऊस नसावा तसेच मोड आलेले भात बियाणे पाखरांनी खाऊ नये म्हणून त्याची राखण करावी लागते आहे. अजूनही शेतकरी भात रोपवाटिका तयार करण्यासाठी झगडतोय. भात रोपे पाण्याखाली गेल्याने रोपांची टंचाई निर्माण होणार आहे.

मोढे प्रक्रियेत भात बियाणे एका मोठ्या पाटीत घेऊन त्यामध्ये शेण व पाणी योग्य प्रमाणात मिसळावे आणि एका रात्रीनंतर यामधील भात बियाणे पुन्हा एका दुसऱ्या पाटीत काढून घेऊन त्या पाटीत गोणपाट टाकून बियाणे हवाबंद केले जाते. तीन दिवस झाले कि भात बियाण्यास मोड येतात म्हणजे अंकुर फुटतात व मग हे अंकुर फुटलेले भात बियाणे जमिनीत रुजते, असे साठेसाई येथील शेतकऱ्याने सांगितले.

02197

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कृषी खातं म्हणजे त्रास? क्रीडा खात्याचं बरं होतं, लय त्रास नव्हता, मंत्री भरणेंचं विधान; स्पष्टीकरणही दिलं

Asia Cup 2025 साठी पाकिस्तान संघाची घोषणा! बाबर आझम, रिझवानला डच्चू; पाहा कोण झालं कर्णधार

Asim Munir : 'अल्लाहनं मला रक्षक म्हणून पाठवलंय...'; ऑपरेशन सिंदूरमध्ये पराभूत झाल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानचे लष्करप्रमुख?

Success Story: ऊसतोड कामगाराची लेक ठरली मुंबई पोलिसांत; गावकऱ्यांचा अभिमान वाढला

Bihar Elections 2025 : बिहारमध्ये गुंतवणूकदारांसाठी पायघड्या; नीतिशकुमार यांची आर्थिक विशेष पॅकेजची घोषणा

SCROLL FOR NEXT