पुणे, ता. २८ : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदूराष्ट्राची संकल्पना पुढे रेटली जात आहे. या संकल्पनेपासून सावध राहावे लागेल. राजकारण, धर्मकारण अशुद्ध अवस्थेवर आधारित बेतले असताना धर्माधर्मांत संवाद वाढायला हवा, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातर्फे रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या ८८ व्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत साळवे आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संजीवनी कदम यांना ‘रमाईरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, त्या वेळी सबनीस बोलत होते. या प्रसंगी रमाई महोत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, माजी नगरसेविका लता राजगुरू, राष्ट्रीय स्मारकाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, कुणाल राजगुरू, रमाई स्मारक समितीच्या मुख्य निमंत्रक प्रेरणा गायकवाड आदी उपस्थित होते.
साळवे म्हणाले, ‘‘देशाला आज प्रतिगामी शक्तींपासून धोका आहे. या शक्तींविरोधात नेटाने उभे रहायला हवे. त्याकरिता आधी गांधी, लोहिया व आंबेडकरांचा विचार समजून घेतला पाहिजे. गांधीवाद, लोहियावाद व आंबेडकरवादी विचार एकत्रित करून दुसरा पर्याय देणे, ही आजच्या काळाची गरज आहे.’’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.