पुणे, ता.५ : मे महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांदा, भुईमूग, उन्हाळी बाजरी यांसारख्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. परिस्थितीची दखल घेत शासनाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पंचनामे जवळपास पूर्ण होऊनही अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा अहवाल शासनाच्या दारापर्यंत पोचलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर, इंदापूर, बारामती, दौंड आणि पुरंदर या तालुक्यांमध्ये पावसाचा मोठा फटका बसला होता. महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकांनी बाधित शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शासकीय नियमानुसार पंचनामेही पूर्ण झाले. मात्र, या पंचनाम्याचा अंतिम अहवाल प्रशासनाकडून शासनाकडे पाठवण्याचे काम राहिले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र थांबले आहे. नवीन पेरणीचा हंगाम सुरू होण्याच्या तयारीत असताना मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतीच्या मशागतीसाठी तर वेळ मिळालाच नाही. परंतु, हाती आलेल्या पीक पावसामुळे वाया गेले. यासाठी शासनाकडून नुकसान भरपाईची अपेक्षा आहे.
तातडीने मदतीची अपेक्षा
मे महिन्याच्या २५ दिवसांमध्येच तीन हजार ९०८ शेतकऱ्यांना फटका बसला होता, त्यामध्ये २ हजार ४७ हेक्टरवरील फळे व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तातडीने मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत कृषी विभागाकडून एक ते दोन दिवसांमध्ये अहवाल सादर होईल, असे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.