पुणे

मराठी तरुणांची आसाममध्ये हेळसांड

CD

पांडुरंग सरोदे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ७ ः आसाम रायफल्सच्या भरतीसाठी महाराष्ट्रातून आसाममध्ये गेलेले काही तरुण कोरोनाबाधित आढळल्याने त्यांना तेथील दिपू वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ठेवण्यात आले. सुरुवातीला तीन दिवस जेवण, पाणीही मिळाले नाही, आता निकृष्ट जेवणामुळे, थंड पाण्यामुळे तरुण आजारी पडलेत, काही जण पळून गेल्याने ते सुटले, परंतु अजूनही २०० पेक्षा जास्त तरुण तेथे अडकून पडले आहे.
भरती प्रक्रिया ७ व ८ जानेवारी दरम्यान होणार होती. महाराष्ट्रातील २०० ते २५० हून अधिक उमेदवार ३ जानेवारीला आसाम राज्यातील करबी अँगलाँग या जिल्ह्यातील दिपू या छोट्याशा शहरामध्ये दाखल झाले होते. तेथेच त्यांची भरती प्रक्रिया होणार होती. दरम्यान, भरतीपूर्वीच उमेदवारांची कोरोनाची रॅपीड अँटिजेन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील ६० ते ७० जण कोरोना संसर्गाने बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यासह २०० हून अधिक तरुणांना दिपू वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
रुग्णालयात दाखल केल्यापासून सुरवातीची दोन ते तीन दिवस तरुणांना जेवण, पुरेसे पाणी देण्यात आले नाही. तीन दिवसानंतर तरुणांना निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात आले. दिपू हे थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे. तरुणांमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे सौम्य आहेत, मात्र बदललेले वातावरण, निकृष्ट जेवण, पुरेसे पाणी नसल्यामुळे तरुणांना उलट्या, जुलाबाचा त्रास होऊन त्यांची तब्येत बिघडू लागली आहे. याबाबत तरुणांनी स्थानिक प्रशासन, महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष, नेते, सरकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला, मात्र अजूनही त्यांना मदत मिळाली नसल्याने तरुण अडकून पडलेले आहेत. त्यामध्ये पुणे, नगर, सांगली, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, धुळे असे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील तरुणांचा समावेश आहे. भितीपोटी २० ते २५ मुले तेथून पळून गेली आहेत, उर्वरित तरुण मदतीसाठी आस लावून बसले आहेत. महाराष्ट्रातून भरतीसाठी गेलेले तरुण ४ ते ५ वर्षांपासून कठीण परिस्थितीवर मात करीत संबंधित पदासाठीची तयारी करीत आहेत. कोरोनामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आल्याने तरुण आणखीनच हवालदिल झाले आहेत.

आम्ही गरीब शेतकरी कुटुंबातील मुले आहोत. ४-५ वर्षांपासून तयारी करीत आहोत. या प्रकारामुळे आमची संधी हिरावून घेऊ नका. आमची येथून सुटका करा.
- किरण आव्हाड, पारवा, परभणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT