पुणे, ता. २१ : संधिवात व्यवस्थापनासाठी समग्र दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे असे मत विविध तज्ज्ञांनी व्यक्त केले. संधिवाताच्या रुग्णांना मदत करण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘मिशन आर्थ्रायटिस इंडिया’तर्फे (माई) राष्ट्रीय संधिवात रुग्ण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी संचेती कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्राध्यापिका डॉ. नीलिमा बेडेकर आणि रशना दारूवाला तसेच संधिवात तज्ज्ञ डॉ. अरविंद चोप्रा तसेच अरुण नहार आणि ‘माई’च्या संस्थापक सदस्य शरयू भट उपस्थित होते. ‘स्वयंप्रतिकारक संधिवाती आजारांत होणारे विविध परिणाम’ ही या परिषदेची संकल्पना होती.
या परिषदेत अस्थिरोगतज्ज्ञ आणि संचेती रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पराग संचेती यांना ‘श्री. पी. सी. नहार वक्तृत्व पुरस्कार’, हरिभाऊ राठीजी ‘वात विरुद्ध योद्धा’ पुरस्कार, मिशन आर्थ्रायटिस इंडियाच्या (माई) माजी अध्यक्षा शिवानी बर्वे यांना तर सेंटर फॉर र्हुमॅटिक डिसिजेस (सीआरडी) तर्फे ‘वात विरुद्ध योद्धा’ पुरस्कार एएस् डब्लूएस् सपोर्ट ग्रुपचे संस्थापक सदस्य भूषण घाटे यांना प्रदान करण्यात आला.
प्रा. डॉ. नीलिमा बेडेकर म्हणाल्या, ‘‘आपले आरोग्य राखण्यासाठी स्नायूंचा वापर केला पाहिजे. औषधोपचार आणि उपचारांव्यतिरिक्त ध्यान-धारणा, व्यायामाने आपले स्नायू बळकट केले पाहिजे.’’
डॉ. संचेती यांनी संधिवात व्यवस्थापनाच्या बहुविध पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. दीपा मेहता म्हणाल्या, ‘‘नामवंत डॉक्टरांकडून संधिवाताबाबत माहिती मिळवण्यासाठी हे योग्य व्यासपीठ आहे. पेशंट सपोर्ट ग्रुपमुळे भावनिक आधार, आपुलकीची भावना, इतरांच्या चिंता समजून घेण्यास मदत, आपले अनुभव सांगणे, माहितीची देवाण घेवाण यामुळे आपण एकटे नाही याची जाणीव होते. यामुळे रुग्णांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होते.’’ डॉ. चोप्रा म्हणाले, ‘‘पेशंट सपोर्ट ग्रुप हा डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा आहे.’’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.