पुणे, ता. १८ ः गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल व नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) उड्डाणपूल वाहतुकीसाठी तातडीने खुले करावेत. भाजपच्या इव्हेंटची वाट पाहत बसू नये, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंद ऋषी महाराज चौकाजवळील राजभवन येथून ई स्क्वेअरच्या दिशेने येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच सिंहगड रस्त्यावरील गंगा भाग्योदय चौक ते विठ्ठलवाडी मार्गावरील उड्डाणपुलाचे कामही झालेले आहे. मात्र, या दोन्ही उड्डाणपुलांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मात्र फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले होत नसल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे. त्याबाबतचे पत्र जोशी यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुलांचे उद्घाटन करण्याच्या अट्टहासामुळे दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले होत नाहीत. सत्ताधाऱ्यांना या पुलाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून इव्हेंट करायचा आहे आणि त्याद्वारे निवडणुकीत राजकारण साधायचे आहे. महापालिका प्रशासनाने भाजपच्या अशा इव्हेंटची वाट पाहत बसू नये. दोन्ही रस्त्यांवर रहदारीच्यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. नागरिकांची गैरसोय होते. गणेशोत्सवाच्या काळात पुणेकरांची कोंडी कशासाठी ? त्यामुळे दोन्ही पूल वाहतुकीसाठी तातडीने खुले करण्यात यावेत, असे जोशी यांनी महापालिकेस दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.