पुणे, ता. १३ : ईशान्या फाउंडेशन व नाबार्ड यांच्यातर्फे १८ वा ‘यलो रिबन एनजीओ फेअर-ग्रामीण भारत महोत्सव’ हा १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान येरवडा येथील क्रिएटिसिटी येथे सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन स्वदेश फाउंडेशनच्या झरिना स्क्रूवाला, ईशान्या फाउंडेशनच्या पारुल मेहता व नाबार्डच्या सीजीएम रश्मी दराड यांच्या उपस्थितीत होणार आहे.
‘एक्सप्लोर, एम्ब्रेस, इव्हॉल्व’ या संकल्पनेवर आधारित या फेअरमध्ये २० राज्यांतील कारागीर, शेतकरी, विणकर व स्वयंसेवी संस्था सहभागी होणार असून, तीन हजारांहून अधिक हस्तनिर्मित व शाश्वत उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असतील. यात वस्त्र, सेंद्रिय अन्नधान्य, पर्यावरणपूरक भांडी, सजावटीच्या वस्तू तसेच मराठमोळे खाद्यपदार्थ यांचा समावेश आहे.
‘‘खरेदीसोबतच कारागिरांशी संवाद, मुलांसाठी प्ले झोन, तासागणिक लकी ड्रॉ व थेट खाद्यकाउंटर यामुळे हा उत्सव संपूर्ण कुटुंबासाठी अनुभवमय ठरणार आहे. हा फेअर म्हणजे उपजीविका, परंपरा व शाश्वततेचा उत्सव आहे, येथील प्रत्येक खरेदी महिलांना सशक्त करते, शेती व विणकाम समुदायांना आधार देते, ’’ असे पारुल मेहता यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.