पुणे, ता. २ ः सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी मंत्रोच्चाराने सोयाबीनचे पीक वाढण्याचा केलेला दावा पूर्णपणे अशास्त्रीय आहे. वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाउंडेशनतर्फे देण्यात आलेला प्रयोगशील शेतकरी पुरस्कार वितरणाच्या वेळी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, वसंतराव नाईक यांच्या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून (अंनिस) करण्यात आली आहे.
‘शेतात बियाणे पेरल्यापासून धर्मसंस्कार केले तर शेती भरघोस उत्पादन देते. आम्ही आमच्या धापेवाड्यातल्या शेतीत सोयाबीनला श्री सूक्त व मंत्रोच्चार ऐकवले. त्यामुळे उत्पादन वाढले,’ असे कांचन गडकरी म्हणाल्या होत्या. त्यांचा हा दावा पूर्णपणे अशास्त्रीयअसून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा असल्याचे ‘अंनिस’चे म्हणणे आहे. मंत्रोच्चारांमध्ये काही विशेष सामर्थ्य असते आणि ते ऐकून सोयाबीनचे झाड स्वतःचे उत्पन्न वाढवू शकते ही गोष्ट शास्त्राच्या प्राथमिक तपासणीवरदेखील टिकणारी नाही. सोयाबीनचे शेतकरी गेली अनेक वर्षे सरकारच्या धोरणामुळे अडचणीत येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोयाबीनला सरकारने सांगितलेला हमी भाव न देता अशा स्वरूपाचे दैववादी उपचार सांगणे हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंसमोर ते केले जात असताना त्यांनी जर त्याचे खंडन केले नाही तर शेतकऱ्यांना ते खरे वाटू शकतात म्हणून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि हा पुरस्कार देणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या विषयी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र ‘अंनिस’कडून नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, हमीद दाभोलकर, राजीव देशपांडे, राम डोंगरे, प्रकाश घादगिने, सम्राट हटकर, मुक्ता दाभोलकर, अशोक कदम यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.