मोरवे - विहिरीवर जीव धोक्‍यात घालून पाणी काढताना महिला.
मोरवे - विहिरीवर जीव धोक्‍यात घालून पाणी काढताना महिला. 
पुणे

चार किलोमीटरच्या पायपिटीनंतर भागते तहान

सकाळवृत्तसेवा

पवनानगर - पवन मावळ हा पूर्व व पश्‍चिम भागात विभागला आहे. पूर्व भागातील गावे ही पवना नदीच्या काठावर वसलेली आहे. पवना धरण हे या गावांसाठी पाण्याचा मुख्य जलस्रोत आहे. मात्र, पश्‍चिम भागातील डोंगराळ पट्ट्यातील गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या या भागात टॅंकरने पुरवठा सुरू असून काही ठिकाणी महिलांना तीन ते चार किलोमीटरची पायपीट करून तहान भागवावी लागते.

पूर्व भागामध्ये ब्राह्मणोली, कोथुर्णे, काले, येळसे, कडधे, महागाव, शिवली, येलघोल, धनगव्हाण, आर्डव, करूंज, बेडसे या गावांचा समावेश होतो. बहुतेक गावांच्या पाणीयोजना पवना नदीवरच आहेत. परंतु वाढती लोकसंख्या आणि जुन्या झालेल्या योजनांमुळे अनेक गावांमध्ये नळकोंडाळी मोकळीच असल्याचे दिसून येते. त्यामुळे पाण्याची समस्या भेडसावते. तर लोहगड, धालेवाडी, मालेवाडी, घेरेवाडी, दुधिवरे ही गावे डोंगरावर आहेत. येथील नागरिकांना पाण्यासाठी विहीर, नैसर्गिक झरे किंवा बोअरवेलवर अवलंबून राहावे लागते. परंतु उन्हाळ्यामुळे नैसर्गिक झरे आटले असून, बोअरवेलची पाण्याची पातळी खाली गेल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 

पश्‍चिम पट्ट्यातील गावांचा विचार करता उन्हाळ्यात पवना धरणाची पाणीपातळी झपाट्याने कमी होते. या भागात जवण, अजिवली, चावसर, मोरवे, बोडशीळ, वाघेश्‍वर, तुंग, विठ्ठलवाडी, डोंगरवाडी या गावांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या जवण येथे टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर अजिवली येथील पूर्वीची पाणीयोजना ही राईच्या डोंगरातून नैसर्गिक झऱ्यावर असून त्याद्वारे गावाला पाणीपुरवठा केला जातो. परंतु काही दिवसापूर्वी लागलेल्या वणव्यामुळे ही जलवाहिनी जळाली असून ती नादुरुस्तच आहे. ग्रामपंचायतीने २९ लाख रुपयांची पवना धरणावरील मंजूर केलेली नवीन पाणीयोजना अजूनही ठेकेदाराने हस्तांतरित न केल्याने ती बंदच आहे. त्यामुळे येथील महिलांना डोक्‍यावर पाणी वाहून न्यावे लागते. या भागातील मोरवे गावाला सगळ्यात जास्त पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. हे गाव धरणापासून ३ ते ४ किलोमीटर अंतरावर असल्याने या गावाला कोणतेही पाणीयोजना नाही.

गावातील विहिरीतील पाणी मार्चअखेर कसेबसे पुरते. सध्या ग्रामपंचायतीच्या वतीने दररोज दोन टॅंकर पाणी विहिरीत टाकून पाणीपुरवठा केला जातो. सध्या गावासाठी ५४ लाखांची पाणीयोजना मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. चावसर येथील डोंगरवाडी व विठ्ठलवाडीला पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. विठ्ठलवाडीसाठी पूर्वीची नळयोजना तुटली असल्याने त्यांनाही टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. तर डोंगरवाडी येथे नागरिकांना मात्र, झऱ्यात साठलेले दूषित पाणी प्यावे लागत आहे. तुंग गावाजवळ असलेल्या विहिरीमुळे गावाला मुबलक असा पाणीसाठा उपलब्ध होत असतो. परंतु विहिरीने तळ गाठल्याने अनियमित पाणीपुरवठा होत असून चार ते पाच दिवसांतून पाणी येत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते.

उपाययोजना
  पाणीयोजनांना मंजुरीची गरज
  नैसर्गिक स्रोतांचे पुनरुज्जीवन
  गावातील नळ दुरुस्ती
  धरणातून नव्या योजनांना मंजुरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT