सप्तरंग

एकटे, तरीही एकांतवास नाही! (श्री श्री रविशंकर)

श्री श्री रविशंकर

चेतना तरंग
तुम्हाला असं वाटत असंल, की तुमच्यावर कोणीच प्रेम करीत नाही, तर तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा की तुमच्यावर प्रेम केलं जातं आहे! ही पृथ्वी तुमच्यावर प्रेम करते, म्हणूनच तिनं तुम्हाला धरून ठेवलं आहे. पृथ्वीचं तुमच्यावरचं प्रेम म्हणजे गुरुत्वबल. हवाही तुमच्यावर प्रेम करते, म्हणूनच तुम्ही झोपलेले असतानाही ती तुमच्या फुफ्फुसांतून वाहत असते. देवही तुमच्यावर मनापासून, अगदी हृदयापासून प्रेम करतात. एकदा तुमच्या हे लक्षात आल्यावर तुम्ही स्वतःला कधीही एकटे समजणार नाही. 

एखाद्याची साथ तुमचा एकटेपणा कधीही घालवत नाही. यातून एकटेपणा गेला, तरीही तो फार काळासाठी नसतो. खरंतर, एकटं राहूनच एकटेपणा भरून काढता येतो! तुम्हाला काही काळासाठी स्वतःच्याच साथीत राहायला आवडत असल्यास तुम्हाला कधीच एकटेपणा जाणवणार नाही व तुम्ही तुमच्या भोवतालच्यांना आनंद देऊ शकाल. तुम्हाला एकटेपणा जाणवत असल्यास तुम्ही केवळ नैराश्‍यच पसरवाल. त्यातून तुम्ही अधिक एकटे पडाल! विचार करा, तुम्हाला तुमची स्वतःची साथच कंटाळवाणी वाटत असल्यास इतरांचं काय? लोक आनंदोत्सव साजरे करण्याच्या मागं धावत असतात. मात्र, यातून तुमच्यात एकटेपणाची भावना निर्माण होईल. त्याउलट तुम्ही स्वतःच्याच सानिध्यात आनंद उपभोगत असल्यास आनंदोत्सव तुमच्या भोवती गर्दी करतील.

लोकांच्या गराड्यात असणाऱ्या व्यक्ती एकांतपणाच्या शोधात असतात, तर एकांतवासातील व्यक्ती गर्दी शोधत असतात. प्रत्येक जण या दोन्हीत समतोल साधण्याच्या प्रयत्नात असतो. हा समतोल आपल्याला स्वतःमध्येच सापडतो. तुम्ही स्वतःसाठी काही वेळ, वर्षभरातील एखादा आठवडा, काढून तुमचेच विचार आणि भावभावना जाणून घ्या. त्यातून तुम्हाला मनःशांती म्हणजे काय हे समजेल. तुम्ही वरचे वर तुमच्या अगदी जवळ असलेल्या लोकांपासून थोडं दूर व्हा. दिवसभरात कधीही थोडा वेळ काढून तुमच्या हृदयामध्ये डोकावून पाहा. या वेळी एकटे असूनही तुम्हाला एकांतपणा जाणवणार नाही. 

तुम्ही आयुष्यभर इतरांच्या उपयोग पडल्यास करोडो लोक तुमची काळजी घेतील. मदर तेरेसा आणि आचार्य विनोबा भावे आयुष्याच्या शेवटी अंथरुणाला खिळून होते. तुम्हाला काय वाटतं, त्यांना साथ देण्यासाठी त्या वेळी कोणीही नव्हतं? लोक या दोघांनी त्यांच्या भल्यासाठी केलेल्या कामांच्या बदल्यात त्यांची काळजी घेण्यासाठी उतावीळ होते. सेवा हेच तुम्ही आयुष्याचे एकमेव ध्येय ठेवल्यास तुमच्यातील भीती दूर होईल, मन एकाग्र होईल आणि कृतीमध्ये नक्की उद्देश येईल. तुम्ही उदास, दुःखी आणि एकटे असता, तेव्हा तुम्ही तुमच्यातील मर्यादांच्या संपर्कात असता. या क्षणी तुम्ही सर्वांचे आभार माना आणि शांततेसाठी प्रार्थना करा. यातून तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल आणि कितीही विपरीत परिस्थिती असली, तरी त्यातून तुम्ही सहीसलामत बाहेर पडण्याचे बळ  तुम्हाला मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT