सातारा : कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी पीपीई किटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, पीपीई किटची मुदत संपल्यावर त्याची योग्य विल्हेवाट लावाली जात नसल्याच्या कारणास्तव रिपब्लिकन पक्षातर्फे नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, किरण ओव्हाळ, जयवंत कांबळे, दीपक गाडे, रवी कांबळे, भिकाजी सावंत, प्रणव गंगावणे, यशवंत ओव्हाळ, विजय ओव्हाळ आदी उपस्थित होते. श्री. ओव्हाळ म्हणाले, ""मागील काही वर्षांत महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जळगावमध्येही चर्मकार समाजातील तरुणीवरील अत्याचाराची अमानुष घटना घडली आहे. या घटनेतील संशयितांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.''
टपाल तिकिटांवर आता वैयक्तिक फोटो; टपाल विभागाचा माय स्टॅम्प उपक्रम
सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी पीपीई किटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, पीपीई किटची मुदत संपल्यावर त्याची योग्य विल्हेवाट लावावी, असेही ओव्हाळ यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.