konark temple esakal
टूरिझम

मोठमोठे जहाज आपल्याकडे खेचून घेणारे एक मंदिर! जाणून घ्या रहस्य

भारत देश अनेक रहस्यमय गोष्टींनी भरलेला आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारत देश अनेक रहस्यमय गोष्टींनी भरलेला आहे. अशा अनेक रहस्यमयी जागा आहेत जिथले कोडे मानवाला अद्यापही सुटलेले नाही. अशीच एक जागा आहे जिथे समुद्रामध्ये मध्यभागी जाणारे जहाज पुन्हा समुद्र किनाऱ्याकडे ओढले जाते. आज आपण अशाच रहस्यमय आणि ऐतिहासिक पुरातन काळातील मंदिरा बद्दल जाणून घेणार आहोत. जे ओरिसा राज्यातील पूरी या ठिकाणी वसलेले आहे.

जिथे भगवान श्री कृष्ण, बलराम,आणि सुभद्रा यांच्या पावण मंदीरा पासून थोड्याच किलोमीटर अंतरावर भगवान सूर्याचे कोणार्क मंदिर स्थित आहे. हे मंदिर समुद्रापासून काहीच अंतरावर आहे. ही मंदिराची कलात्मकता पाहून सगळे लोक मंत्रमुग्ध होतात. या मंदिराची पौराणिक घडण बघून हे भव्य मंदिर त्या काळी साधनांचा आभाव असतानाही कसे बांधले गेले असल्याने या बाबत भक्तांमद्ये कमालीची उत्सुकता आहे. अशा अनेक पौराणिक आणि रहस्यमय गोष्टी या मंदीराबद्दल दडलेले आहे .

१८६४ मंध्ये युनेस्को ने या कोडाच्या मंदिराला विश्व धरोहर चा दर्जा दिला. हे मंदिर ओरिसा राज्यातील पुरी या ठिकाणी आहे. तिथूनच ४० किलोमीटर दूरच कोणार्क सूर्य मंदिर स्थित आहे . चंद्र भागा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे सूर्य मंदिर रहस्यमय आणि ऐतिहासिक आहे. या ठिकाणी देश-विदेशातून पर्यटक येतात. हे एक पर्यटणाचे केंद्र बनलेले आहे. भारतातील अनेक धार्मिक मंदिरं लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात.

या ठिकाणाला कोणार्क हे नाव कसे पडले असावे? तर लोकांच्या माहितीनुसार हा शब्द दोन शब्दानी बनलेला आहे. एक कोना म्हणजे किनारा आणि अर्क म्हणजे सूर्य या शब्द एकत्रितरित्या या मंदिराला कोणार्क हे नाव दिले गेले असावे. पुराणातील कथेच्या इतिहासावरून अशी माहिती मिळते की हे मंदिर १३ व्या शतकात बांधलेले गेले असावे.या मंदिराची कलात्मकता पाहून असे वाटते की हे मंदिर खूपच विचार करून आणि आपल्या निपुणतेने बांधले गेले असावे. पुराणातील कथेवरून या मंदिराचे निर्माण गंग वंशचा राजा नरसिंहदेव याने आपल्या काळात १२४३ ते १२५५ मध्ये केले असावे. हे मंदिर बांधण्यासाठी १२०० कारागीर लागले होते. असे सांगितले जाते

त्या काळातील लोकं त्या काळात सूर्य देवाची आराधना करत होते. यामुळे हे कोणार्क सूर्य मंदिर बांधले गेले असावे अशी मान्यता आहे. कलिंग शैलीमध्ये हे मंदिर बांधले गेल्याने खुद्द भगवान सुर्यदेव स्वतः धर्तीवर अवतरले आहेत.असा भास भक्तांना होतो. सुर्यदेव साक्षात रथात विराजमान झालेले असून ते स्वर्गातून अवतरले आणि पृथ्वीवर प्रगटले असे वाटते.या मंदिराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे. जसे की सूर्यदेव आपल्या रथात विराजमान होऊन पुडे जात आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT