akshay
akshay 
उत्तर महाराष्ट्र

टँकरखाली दबून चिमुकल्याचा मृत्यू

रणधीर भामरे

वीरगाव : बागलाण तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी एका चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (ता. 6) घडली आहे. वटार (ता. बागलाण) येथे आज सकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या मामाच्या शेतातून पिण्यासाठी पाणी वाहतूक करत असताना स्वमालकीच्या टँकरखाली दबून तालुक्यातील विरगाव येथील एका पाचवीत शिकणाऱ्या अकरा वर्षाच्या मुलाला आपला प्राण गमवावा लागला आहे.

वीरगाव (ता. बागलाण) परिसरात सध्या पाणीबाणी झाली असताना घडलेली ही घटना तालुक्यात दुष्काळाचा पहिला बळी घेणारी ठरली आहे. विरगाव येथील हिरामण भिला गांगुर्डे यांचा नातू अक्षय नंदू गांगुर्डे (वय 11) हा आज सकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या वडीलांसमवेत वटार येथे मामाच्या मळ्यात टँकर भरण्यासाठी गेला होता. यावेळी परत येत असताना अक्षयचा तोल गेल्याने तो खाली पडून याचे अपघाती निधन झाले. यामुळे बागलाण तालुक्यातील विरगाव गावावर शोककळा पसरली आहे. पाण्यासाठी अशा गंभीर पद्धतीने जीव गमावल्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT