नाशिक - अखिल भारतीय किसान सभेतर्फे गुरूवारी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला.
नाशिक - अखिल भारतीय किसान सभेतर्फे गुरूवारी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला. 
उत्तर महाराष्ट्र

‘लाँग मार्च’च्या सरकारशी नाशिकजवळ वाटाघाटी

सकाळवृत्तसेवा

नाशिक - पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या समवेतची काल (ता. २०) रात्रीची चर्चा फिसकटल्यावर आज सकाळी किसान सभेच्या लाँग मार्चने मुंबईच्या दिशेने कूच केली. हा लाँग मार्च विल्होळीच्या पुढे येताच पुन्हा मागण्यांबाबत वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत त्या सुरू होत्या. 

महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह आमदार जे. पी. गावित, डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, माजी आमदार नितीन भोसले यांची सायंकाळपासून अदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा सुरू झाली. आंदोलनकर्त्यांना माळरानावर थांबविण्यात आले आहे. 

दरम्यान, विल्होळी जवळ माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी जाऊ देणार नाही, असा इशारा दिला. महाराष्ट्राचे हक्काचे पाणी अडविण्यासाठी निधीची जरी अडचण आली तरी पाण्यावरचा हक्क सोडू नये, अशी आग्रही मागणी भुजबळ यांनी केली.

सरकारने मागण्यांबाबत लेखी आश्‍वासन द्यावे, आश्‍वासनावर समाधान झाल्यास लाँग मार्चचा विचार केला जाईल, अन्यथा हा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने निघेल, असा इशारा आमदार गावित यांनी दिला आहे. त्यामुळे सरकारचे वाटाघाटी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT