rupali chakankar rashtrawadi dhule panchanama
rupali chakankar rashtrawadi dhule panchanama 
उत्तर महाराष्ट्र

Vedio : व्हॉट्‌सऍपद्वारे पिकांचा पंचनामा...तलाठ्याची अजब शक्‍कल

निखिल सूर्यवंशी

धुळे : अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त पिकांचा व्हॉट्‌सऍपव्दारे पंचनामा होऊ शकतो का? तर होय, होऊ शकतो. जिल्ह्यातील बळसाणे येथील तलाठी महोदयांनी ही करामत करून दाखवली आहे. दौ-यात ते पाहून चक्रावलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या अजब प्रकाराची पोलखोल करत सरकारी यंत्रणेच्या कारभाराचा पंचनामाच येथे केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर शुक्रवारी (ता. 15) जिल्हा दौऱ्यावर होत्या. त्यांनी देशभरातील जैन धर्मियांचे तिर्थक्षेत्र असलेल्या बळसाणे (ता. साक्री, जि. धुळे) येथे दुपारनंतर भेट दिली. परतीच्या पावसासह अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमती चाकणकर यांनी बळसाणेसह विविध गावातील पीडित शेतकरी व समस्याग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी जागोजागी अतिवृष्टीमुळे शेतमालाचे झालेले नुकसान आणि त्यामुळे हतबल झालेल्या शेतक-यांसह ग्रामस्थ महिलांशी संवाद साधताना श्रीमती चाकणकर गंभीर झाल्या. 

पंचनामा ग्रुप..बळसाणे 
बळसाणे येथे तलाठ्याने नुकसानग्रस्त शेतात जाऊन पिकांचा पंचनामा करण्याऐवजी चक्क व्हॉटस्ऍपवर "पंचनामा ग्रुप, बळसाणे", असा ग्रुप सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीमती चाकणकर यांच्या दौऱ्यात उजेडात आला. त्या ग्रुपमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानग्रस्त शेताचे व पिकाचे फोटो पोस्ट करायचे, अशी अनाकलनीय करामत तलाठ्याने केली. राज्यात असा अजबच प्रकार येथे पहायला मिळाल्याने श्रीमती चाकणकर चक्रावल्या आणि संतप्त झाल्या. विविध कारणांनी रोज संकटाशी मुकाबला करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामा करण्याऐवजी तलाठ्याने ही कोणती पद्धत अमलात आणली आणि त्याचे असे धाडस कशामुळे झाले, असा प्रश्न श्रीमती चाकणकर यांना पडला. तसेच ज्या शेतकऱ्याकडे मोबाईलच नसेल त्याने फोटो कसे पोस्ट करायचे, त्याच्या नुकसानग्रस्त पिकाचा पंचनामा कसा होऊ शकेल, संबंधित पीडित शेतकऱ्याला कसा न्याय मिळेल, असे संतप्त प्रश्न उपस्थित करत श्रीमती चाकणकर यांनी स्थानिक सरकारी यंत्रणेच्या विचित्र कारभाराचा शेतकरी, अन्य ग्रामस्थां समक्ष पंचनामा केला. तसेच शेतात जाऊन यंत्रणेने पंचनामे करावे, अशी मागणी केली. 

राज्यपालांकडे करणार तक्रार 
या संदर्भात पीडित शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पक्षाचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यासह राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचे श्रीमती चाकणकर यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या अशा विचित्र कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांपाठोपाठ ग्रामस्थांनी वीज, पाणी, रस्ते, रोजगारासंबंधी समस्या श्रीमती चाकणकर यांच्यापुढे मांडल्या. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT