farmer vanchit.jpg
farmer vanchit.jpg 
उत्तर महाराष्ट्र

वर्ष उलटले.. तरीही 'इथले' शेतकरी पेन्शनपासून वंचित 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंतप्रधान किसान योजना लागू होऊन वर्ष उलटले तरीही गिलाणे येथील शेकडो शेतकरी या पेन्शन योजनेपासून वंचित आहेत. अनेक शेतकऱ्यांना अद्याप पेन्शन योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही. या संदर्भात येथील तलाठी चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे या योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

काही शेतकऱ्यांना पेन्शन योजनेचा एकही हप्ता नाही

राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान पेन्शन योजना गतवर्षापासून लागू केली आहे. दर वर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची पेन्शन देण्याची योजना केंद्र शासनाने अंमलात आणली आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांचे सात-बारा, आधारकार्ड आणि बॅंकेचे खाते नंबर ऑनलाइन करण्याचे काम तलाठ्यांकडे सोपविले होते. पण ते काम काळजीपूर्वक न केल्याने अनेक शेतकऱ्यांची पेन्शन योजनेची कागदपत्रे ऑनलाइन न झाल्याने येथील तब्बल 300 शेतकरी वर्ष होऊनही या योजनेपासून वंचित आहेत. काही शेतकऱ्यांना पेन्शन योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे. बॅंकेत चकरा मारून कंटाळल्याच्या प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी "सकाळ'ला दिल्या आहेत. 

कागदपत्रे ऑनलाइन अपडेट न झाल्याने शेतकऱ्यांत तीव्र संताप 
पंतप्रधान किसान योजनेचा सर्व्हे करण्यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची माहिती व्यवस्थित ऑनलाइन न केल्यामुळेच येथील तीनशे शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. दरम्यान, तलाठी चव्हाण यांच्याकडे येथील अतिरिक्त कार्यभार असून, आठवड्यात एकच दिवस ते गावात थांबत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. पूर्णवेळ तलाठी नेमून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी येथील संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

Latest Marathi News Live Update: राज्य सहकारी बँकेकडून विठ्ठल कारखान्याचा साखर साठा ताब्यात घेण्याची नोटीस प्रसिद्ध

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT