jalgaon dity dengu pesiants
jalgaon dity dengu pesiants 
उत्तर महाराष्ट्र

डेंग्यू, मलेरियासोबतच टायफाईडचे रुग्ण वाढले 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः यंदा पाऊस लांबल्याने साचलेल्या पाण्यामुळे साथरोगांसह डेंग्यू आजाराची प्रमाण वाढले आहे. शहरातील काही नागरी वस्त्यांमधील सखल भागांत व खुल्या भूखंडांवर सांडपाण्याच्या साचलेल्या डबक्‍यांमुळे रोगराई वाढली आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांचा उपद्रव वाढून साथीचे रुग्ण वाढत आहे. 

परतीच्या पावसाने पुरती वाट लागली असून शहरातील अनेक भागात अद्यापही मोठ्या प्रमाणात डबकी, तसेच गवत, झाडेझुडपे वाढलेले आहे. याकडे महापालिका प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. यामुळे डासांची उत्पत्ती वाढून मलेरिया, टायफॉईड, न्यूमोनिया यांसारख्या आजारांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागरी 
वस्त्यांमध्ये असलेल्या खुल्या भूखंडांवर पावसाचे वाहून जाणारे पाणी आणि सांडपाण्याचा देखील त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. डेंग्यूची लागण झालेले रुग्ण आढळून येत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजनांसाठी पाहिजे तशी पावले उचलली जात नसल्याचे देखील दिसत आहे. 

"मनपा आरोग्य' विभागाकडे नाही नोंद 
शहरात साथरोगांचा फैलाव होत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना अगदी धिम्या गतीने सुरू आहे. मुख्य म्हणजे शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून, याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नाही. आरोग्य विभागाच्या मलेरिया विभागाकडे डेंग्यूसदृश असल्याची कोणतीही नोंदच नाही 

राजमालती नगरात साचली डबकी 
शहरातील मुख्य परिसरासह बाजारपेठ, व्यापारी संकुलांसह प्रत्येक कॉलनी परिसरात सांडपाण्याची डबकी साचली आहेत. या साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती वाढत आहे. शिवाय, साचलेल्या पाण्यात कचरा असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या पाण्याची डबकी नाहीशी करावीत तसेच धूरफवारणी, औषधी फवारणी करण्याची मागणी होत आहे. 

पांढऱ्या पेशींच्या मागणीत वाढ 
शहरात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ झाली आहे. डेंग्यू झाल्यास शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होत असल्याने अशा व्यक्तींना तत्काळ पांढऱ्या पेशी देणे आवश्‍यक असते. त्यानुसार शहरातील तीन ते चार रक्तसंक्रमण केंद्रात दररोज पांढऱ्या पेशींच्या पिशव्या मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 


डेग्यूचे रुग्ण दररोज वाढत असून शरीरातील पांढऱ्या पेशी झपाट्याने कमी होतात. या पेशी घेण्यासाठी दररोज मागणी वाढत आहे. परंतु पेशी दान करणाऱ्यांची संख्या त्या मानाने कमी आहे. पेशी दान केल्याने कोणत्याच प्रकारची शरीराला हानी होत नाही. त्यामुळे रक्तदानाप्रमाणे पेशी देण्यासाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे. 
-उज्ज्वला वर्मा, जनसंपर्क अधिकारी, रेडक्रॉस सोसायटी, जळगाव 


नागरिकांच्या प्रतिक्रिया... 


प्रत्येक घरात रुग्ण 
मेहमूद पटेल
: शहरात डासांचे प्रमाण वाढल्याने प्रत्येक घरात विविध आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महापालिकेने यावर धुरफवारणी, औषध फवारणी करण्याच्या उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे. 

सफाई होत नाही 
अजय सुरवाडे
: सांडपाण्याचे साचलेले डबके तसेच सफाई मक्तेदारांच्या कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित सफाई होत नाही. त्यामुळे रोगराई वाढल्याने शहरात डेग्यूसह विविध आजाराचे रुग्ण वाढले आहे. 

धुरफवारणी करावी 
भय्या सूर्यवंशी
: शहरात व्यवस्थित सफाई होत नसल्याने तसेच गटारी काढल्या जात नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. तसेच धुरफवारणी व औषध फवारणी देखील झाली नसल्याने साथरोगांचे रुग्ण प्रत्येक घरी दिसून येत आहे. 
 
तक्रार करूनही दुर्लक्ष 
रईस शेख :
 सांडपाणी व घाणीच्या साम्राज्याने डासांचे प्रमाण राजमालती नगरात वाढले आहे. याबाबत तक्रार करून देखील महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मलेरिया विभागाकडून कोणतीही उपयोजना केली जात नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT