उत्तर महाराष्ट्र

भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले

सकाळवृत्तसेवा

जळगाव - राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील अपघातांची मालिका काही केल्या संपायला तयार नाही. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास शहराकडे वळण घेत असलेल्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक देत चिरडले. त्यात दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाला, तर मागे बसलेले दोघे गंभीर जखमी झाले. गेल्या चार दिवसांपूर्वीच रात्री साडेदहाला दुचाकीस्वार सहाय्यक फौजदाराला ट्रकने चिरडल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा याच चौकात भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला धडक देत चिरडल्याने अजिंठा चौक ‘ब्लॅक स्पॉट’ ठरू लागला आहे. 

आंध्र प्रदेशातील मूळ रहिवासी आणि स्टील भांडे, संसारोपयोगी साहित्य विक्रीसाठी भुसावळात काही कुटुंब स्थायिक झाले आहेत. त्यापैकीच श्रीनिवास सत्यनारायण रेड्डी (वय-४०, रा. श्रीनगर, भुसावळ) यांच्या मित्राकडे जळगावात आज लग्नसोहळा होता. तसेच बाजारातही काम असल्याने श्रीनिवास यांच्या मोटारसायकलने (एमएच १९ सीएम१२९३) या वाहनावर आदी सुरय्या रेड्डी (वय-३०), अनिल अेंजल अय्या एटाकल्ली (वय-२०) हे जळगावकडे निघाले. सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी अजिंठा चौकातून वळण घेण्यापूर्वीच मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकचालकाने (जीजे ०३, बीजे ९३३५) रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करीत पुढे चालत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक बसल्यावर दुचाकीवरील तिघे खाली कोसळल्यावर श्रीनिवास ट्रकखाली आल्याने ते जागीच ठार झाले, तर मागे बसलेले दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी विजय पाटील, सचिन देशमुख यांनी अजिंठा चौकात धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात येऊन ट्रकचालकास ताब्यात घेतले. 

वाहतूक थांबली
अजिंठा चौकात पोहोचतानाच दुचाकीस्वाराला ट्रकने रस्त्याच्या मधोमध चिरडल्याने दोन्ही बाजूंकडील वाहतूक जागीच थांबली. औद्योगिक वसाहत पोलिसांसह वाहतूक कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाल्यावर अर्ध्या तासात चौकातील वाहतूक सुरळीत केली. अपघातास कारणीभूत ट्रकचा चालक मोहम्मद अहमद समार (वय-२५, रा. राजकोट) यास जमावाने मारहाण केल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. तसेच अपघातग्रस्त वाहनेही जप्त करण्यात आली.

अजिंठा चौक बनला ‘ब्लॅक स्पॉट’
भुसावळ येथील सहाय्यक फौजदार रघुनाथ कळस्कर यांना गेल्या २९ नोव्हेंबरला अजिंठा चौकात सुसाट ट्रकने धडक दिली. यात कळस्कर यांचा जागीच मृत्यू झाला होता. गुजरातहून पश्‍चिम बंगालकडे तो ट्रक जात होता. आज सकाळी श्रीनिवास यांच्या दुचाकीला धडक दिलेला ट्रक मूळ गुजरातचा व नागपूरकडून गुजरातकडे निघालेला होता. राष्ट्रीय महामार्ग असल्याने रात्रंदिवस लांब पल्ल्याचे मालवाहतूक वाहनांसह इतर वाहनांची महामार्गावर प्रचंड गर्दी असते. मात्र, अलीकडच्या काळात या महामार्गावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून त्यात निष्पापांचे बळी जात आहेत. प्रत्येक आठवड्यात एक दोन मृत्यू होऊ लागल्याने अजिंठा चौक ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळख बनत असल्याचे बोलले जात आहे. 

दिवसाची सुरवात अपघाताने
थंडीच्या दिवसांत महामार्गावर लांबपल्ल्याचीच वाहने अधिक असतात. सकाळी साडेसहा ते आठ या वेळेत शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या व्हॅन व रिक्षांसह नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर पडलेले, नाइट शिफ्टवरून परतलेल्या कामगारांची अजिंठा चौकात लगबग असते. दिवस उजाडताच अजिंठा चौकात अपघातातील दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडल्याचा प्रकार प्रत्यक्षदर्शींच्या अंगात काटा उभा करणारा होता. दिवसाची सुरवातच अपघाती मृत्यूच्या घटनेने झाल्यामुळे दिवस खराब निघाल्याचे नागरिकांकडून बोलले जात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT