farmer1.jpg
farmer1.jpg 
उत्तर महाराष्ट्र

ऐन हंगामात शेतकरी रात्रभर जागते रहो!

सकाळवृत्तसेवा

येवला : शासनाने आश्वासन देऊनही शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पुन्हा एकदा पाणी फिरवले आहे. त्यामुळे ऐन खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना रात्रभर जागून पिकांना पाणी द्यावे लागणार आहे. तर इतर १४ ते १६ तास अंधारात रहावे लागणार आहे.यामुळे शेती सिंचनासाठी दिवसभर बारा तास वीजपुरवठा करावा अशी मागणी बाजार समितीचे संचालक मकरंद सोनवणे यांनी केली आहे.

एकतर पाणी नाही त्यात थोड्याफार प्रमाणात असलेले पाणी पिकांना देणे खंडित वीजपुरवठय़ामुळे शक्य होत नाही. अशातच पुन्हा एकदा महावितरणने रात्रभर सिंचनासाठी वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढविल्या आहेत.विद्युत वितरण कंपनीचा निर्णय शेतकऱ्यांना अन्याय कारक आहे.याबाबत कंपनीचे संचालक सतिष चव्हाण यांनी परिपत्रक काढून शेती पंपासाठी दिवसा फक्त आठ तास व रात्रीच्या वेळी १० तास विजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात राज्याचे वेळापत्रक देखील त्यांनी जाहीर केले आहे.

आठवड्यात फक्त तीनच दिवस दिवस विजपुरवठा असतो तर चार दिवस रात्रीचा असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या सिंचनासाठी खुप त्रास काढावा लागतो. थंडीचे दिवस सुरू होणार त्यात रात्रीचा विजपुरवठा त्यात हिस्र श्वापद, विंचू, साप, चोर अश्या अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना विज पंप चालू करणे शक्य होत नाही. आता रात्रीचे ११ ते सकाळी ९ असे आठ तर व दिवसा ९ ते ५ असे आठच तास वीजपुरवठा सुरु राहणार आहे.फिडरनिहाय काहींना दिवसा तर काहींना रात्री वीज मिळेल. त्यामुळे कंपनीने निदान शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून रात्रीपेक्षा दिवसा विनाखंड अधिक वेळ वीज द्यावी. यामुळे शेतकरी पिके वाचवू शकतील अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.

“पिकांना पाणी देण्यासाठी सप्टेंबर ते फेब्रुवारी हाच महत्वाचा कालखंड आहे.या काळात दिवसभर १२ तास ३ फेज विजपुरवठा करावा.तर याव्यतिरिक्त वेळेत १४ ते १६ तास सर्वत्र सिंगल फेज वीजपुरवठा सुरु ठेवावा.म्हणजे व्यावसायिक,शेतकरी व गृहिणी यांची हाल थांबेल.याविषयी उजाँमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहे.”
मकरंद सोनवणे,संचालक,कृषी उत्पन्न बाजार समिती,येवला

शेतीला असा होईल वीजपुरवठा
सप्टेंबर 
रात्री - ११ ते ९
दिवसा - ९ ते ५

ऑक्टोबर
रात्री - ९.४५ ते ७.४५
दिवसा - ९.४५ ते ५-४५

नोव्हेंबर
रात्री - ९.२५ ते ७-२५
दिवसा - १०.१० ते ६.१०
[

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT