Maratha-Kranti-Morcha 
उत्तर महाराष्ट्र

Maratha Kranti Morcha: आयोजकांविरोधात नाशिकमध्ये गुन्हे

सकाळवृत्तसेवा
नाशिक - मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. 9) पुकारण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनांप्रसंगी झालेल्या गोंधळामुळे आणि त्यानंतर आंदोलकांनी जमावबंदीचा आदेश झुगारून शहरभरातून मोर्चा काढल्याप्रकरणी आयोजकांसह सुमारे 200 जणांविरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी आज चौघांना अटक करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. 9) सकल मराठा समाजातर्फे गंगापूर नाका येथे ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र दुपारी काही तरुणांनी आक्रमक भूमिका घेत, शहरातून मोर्चा काढला. यात काही तरुणांनी ज्या रस्त्यावरून मोर्चा काढला त्या मार्गावरील दुकानांवर दगडफेक केली. काही ठिकाणी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात शुक्रवारी आंदोलनाचे आयोजक माजी महापौर प्रकाश मते, चंद्रकांत बनकर, अजय ऊर्फ मयूर निंबाळकर, कपिल शिंदे यांच्यासह 200 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोडफोडप्रकरणी चौघांना अटक केली आहे.

छायाचित्रणानुसार होणार धरपकड
आंदोलकांनी शहरभर काढण्यात आलेल्या मोर्चाचे छायाचित्रण पोलिसांनी केले असून, त्यामध्ये धुडगूस घालणारे, दगडफेक करणारे तसेच उघड्या दुकानांना बंद करण्यासाठी दहशत माजविणाऱ्यांचा शोध त्यावरून घेतला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT