live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

अंजनी प्रकल्पात अद्याप मृत जलसाठा 

सकाळ वृत्तसेवा

एरंडोल ः पावसाळा सुरु होऊन सुमारे दोन महिन्यांचा कालावधी उलटून देखील तालुक्यात जोरदार पाऊस न झाल्यामुळे अंजनी प्रकल्पातील जलसाठ्यात कोणतीही वाढ झालेली नाही. प्रकल्पात अजूनही मृत जलसाठा असून तालुक्यातील भालगाव, खडके, पद्मालय येथील तलाव देखील कोरडेठाक पडले आहेत. यामुळे आगामी काळात तालुक्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 
गिरणा नदीवरील जामदा बंधाऱ्यावरुन वाहून जाणारे पाणी डाव्या कालव्याच्या माध्यमातून पारोळा ब्राँचद्वारे अंजनी प्रकल्पात सोडून पुनर्भरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तालुक्यात यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला असला तरी सर्व नदी व नाले अद्याप कोरडे आहेत. पावसाळा सुरु होऊन सुमारे दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून जोरदार पावसाअभावी अंजनी प्रकल्पाच्या जलसाठ्यात कोणतीही वाढ झाली नाही. सद्यःस्थितीत प्रकल्पात मृत जलसाठा असून शून्य टक्के उपयुक्त जलसाठा आहे. भालगाव येथील पाझर तलाव कोरडा असून खडके येथील तलावात तीस टक्के जलसाठा झाला आहे. पद्मालय येथील मूगपाठ तलावातील जलसाठ्यात कोणतीही वाढ झालेली नाही. तालुक्यातील सर्व सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झालेली नसल्यामुळे आगामी काळात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे. अंजनी प्रकल्पातून एरंडोल शहरासह कासोदा व अन्य गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. सद्यःस्थितीत पावसाळ्यात देखील शहरात आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अंजनी नदीच्या उगम क्षेत्रात जोरदार पाऊस झाला तरच अंजनी प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होऊ शकते. अंजनी प्रकल्पात असलेला अत्यल्प जलसाठा लक्षात घेऊन जामदा बंधाऱ्यावरुन वाहून जाणारे पाणी डाव्या कालव्याच्या माध्यमातून प्रकल्पात सोडण्यात यावे, अशी मागणी यापूर्वीच माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांनी तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष चिमणराव पाटील यांच्याकडे तर आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. आजी- माजी लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीची प्रशासनाने गांभिर्याने दखल घेण्याची गरज आहे. जामदा बंधाऱ्यातून वाहून जाणाऱ्या पाण्याद्वारे प्रकल्पाचे पुनर्भरण केल्यास तालुक्यातील नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावर्षी प्रकल्पातून हजारो ब्रास गाळ उपसण्यात आळा असल्यामुळे जलसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. अंजनी प्रकल्पाचे पुनर्भरण केल्यास त्याचा लाभ परिसरातील विहिरींना होणार आहे. 

मुसळधार पावसाची प्रतीक्षा 
तालुक्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला असून पिकांची परिस्थिती देखील चांगली आहे. तालुक्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे ७० टक्के पाऊस झाला असला तरी नदीनाले अद्याप कोरडेच आहेत. अंजनी प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी मुसळधार पावसाची गरज असून शेतकरी देखील जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT