live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

सात दिवसात पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत : गिरीश महाजन 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : गेल्या पन्नास ते साठ वर्षात प्रथमच जिल्ह्यात पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण शेतातील पिकांची हानी झाली आहे. अधिकाऱ्यांनी आता कोणतीही सुटी न घेता सात दिवसाच्या आत पंचनामे करून शासनाला अहवाल द्यावा. शासनातर्फे शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल. अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. 
पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जलसपंदामंत्री गिरीश महाजन आज तातडीने मुंबईतून विमानाने जळगावात दाखल झाले, त्यांनी जळगाव तालुक्‍यातील डांभूर्णी, विदगाव, ममुराबाद परिसरात थेट शेतीच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली.शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलाविली. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे,जिल्हा पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले,आमदार चंदूलाल पटेल, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील तसेच सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यानीं अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. 
यावेळी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, जिल्हयात पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शंभर टक्के पिके वाया गेलेली आहेत. गेल्या पन्नास ते साठ वर्षात प्रथमच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कोणतीही सुटी न घेता अधिकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून नुकसानीचे पंचनामे करावेत असे आदेश देण्यात आले आहेत. पंचनामे केल्यामुळे पिक विम्याचे रक्कम मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. ज्यांचे पंचनामे होणार नाहीत, त्यांनी मोबाईलवर नुकसानीचे फोटो काढून पाठवावे असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT