उत्तर महाराष्ट्र

राज्यात प्रथमच "सीईटी' परीक्षा "ऑनलाइन' 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) व औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शासनाकडून दरवर्षी "सीईटी' परीक्षा घेतली जाते. पूर्वी ही परीक्षा शासनातर्फे "ऑफलाइन' घेतली जात असे. मात्र, यंदापासून ही परीक्षा "ऑनलाइन' घेतली जाणार आहे. जिल्हाभरातील बारा हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, पाच केंद्रांवर 2 ते 13 मेदरम्यान ही परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 
अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शासनाकडून "सीईटी' परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत फिजिक्‍स आणि मॅथ्स या विषयांसह इतर विषयांवरील प्रश्‍नावली तयार करण्यात आलेली असते. शासनाकडून आतापर्यंत ही परीक्षा "ऑफलाइन' घेतली जात होती. परंतु यंदापासून ही परीक्षा "ऑनलाइन' पद्धतीने घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातून सुमारे 11 हजार 924 विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, त्यांनी "ऑनलाइन' पद्धतीने रजिस्ट्रेशन केले आहे. ही परीक्षा 2 ते 13 मे दरम्यान ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेची जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण तयारी केली आहे. ही परीक्षा घेण्यासासाठी शासनातर्फे "महाऑनलाइन को ऑर्डिनेशन' या कंपनीला कंत्राट देण्यात आला आहे. या कंपनीतर्फे शहरातील पाच परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार असून, त्यासाठी प्रशसनाने संपूर्ण नियोजन केले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

या केंद्रांवर होणार "सीईटी' परीक्षा 
जिल्ह्यातील गुलाबराव देवकर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 4 हजार 750 विद्यार्थी परीक्षा देणार असून, एस.एस.बी.टी. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 4 हजार 172 विद्यार्थी, गुलाबराव देवकर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 1 हजार 104 विद्यार्थी, गुलाबराव देवकर पॉलिटेक्‍निक महाविद्यालयात 1 हजार 100, तर भुसावळ येथील संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात 798 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 

दोन सत्रांत होणार परीक्षा 
अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवी परीक्षेसाठी घेण्यात येणारी "सीईटी' परीक्षा शासनाकडून दोन सत्रांत घेतली जाणार आहे. सकाळी 7.30 ते दुपारी 1.45 पर्यंत पहिले सत्र; तर दुपारी 12.30 ते सायंकाळी 6.45 पर्यंत दुसरे सत्र राहील. परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रांवर गटविकास अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी असे एकूण 68 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून प्राध्यापक विलास मालकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: कॉंग्रेसमध्ये आता अशी वेळ आली आहे की, ते कोणाचेच ऐकत नाहीत - राजकुमार चौहान

SCROLL FOR NEXT