उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापनेसाठी मंत्रीमंडळाकडे प्रस्ताव पाठविणार : एकनाथराव खडसे

सकाळवृत्तसेवा

जळगाव: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीचे विभाजन करून उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत अधिकाऱ्यांच्या बैठकित चर्चा करण्यात आली. हा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध विषयावर आज मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. 
जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजूरी देवून त्याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव प्रविण परदेशी व एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज बैठक घेण्यात आली. या बैठकिस सर्व संबधित विभागाचे अप्परमुख्य सचिव व प्रधान सचिव उपस्थित होते.तसेच आमदार संजय सावकारे, माजी आमदार गुरूमुख जगवानी उपस्थित होते. 
या बैठकित घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. ते म्हणाले, राहुरी येथील महात्म फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करून उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठाची स्थापना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. हा विषय आता मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. 
 
बैठकित मंजूर करण्यात आलेले निर्णय असे 
-वरणगाव राज्यस्तरीय राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार 
-महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत सालबर्डी येथे पशु व भुसावळ येथे मत्स्य महाविद्यालय सुरू करण्यासाठी अंतिम शिफारस घेवून महाविद्यालय सुरू करणार. 
-यावल तालुक्‍यातील हिंगोणा येथे केळीचे टिश्‍यू कल्चर रोपे तयार करण्याचा शासनाचा प्रकल्प सुरू करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून 30 कोटी रूपयांचा प्रस्ताव दिला हा निधी त्वरीत उपलब्ध करून देण्यात येईल. 
-पाल येथे उद्यान विद्या महाविद्यालय सुरू करण्यासाठी जागा शोधण्याकरीता जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. ती जागा मिळाल्यास त्याला तात्काळ मंजूरी देण्यात येईल. 
-मुक्ताई नगर व बोदवड जलशुध्दीकरण केंद्रासाठी तांत्रीक बाबी पूर्ण करून मान्यता. 
-सावदा,भुसावळ, रावेर, व फैजपूर नगरपंचायत हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून येत्या पंधरा दिवसात मान्यता दिली जाईल. 
-संत मुक्ताई मंदिर कोथळी तिर्थक्षेत्र विकासासाठी 25 कोटी रूपयाचा आराखड्यास मान्यता देण्यात आली असून त्यापैकी 9 कोटी रूपये वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित 16 कोटी रूपये नऊ कोटी रूपये खर्च झाल्यावर वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
-मुक्ताईनगर नगरपंचायतीस वैशिष्टपूर्ण कामासाठी पाच कोटी रूपयांचा निधी येत्या आठ दिवसात वितरीत करण्यात येतील. 
-सावदा ग्रामीण रूग्णालयाच्या पदनिर्मिती मंजूर प्राप्त झालेली असून पद भरतीची कार्यवाही लवकरच करण्यात येईल.त्या बरोबरीत इमारत बांधकामाकरीता बारा कोटी रूपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 
-भुसावळ येथे नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी सद्या अस्तित्वात असलेल्या न्यायालयाच्या इमारतीच्या वर तिसऱ्या मजल्याच्या बांधकामास 11 कोटी 85 लाख इतका निधीस तत्वत:मान्यता देण्यात आली.तातडीने प्रशासकीय मान्यता देवून येत्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून देणार 
-कुऱ्हा वढोदा उपसासिंचन योजनेस अतिरिक्त निधी मिळणेबाबत मुख्यमंत्र्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून त्यास मान्यता देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाना अधिकचा निधी मिळण्यासाठीही विनंती करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT