उत्तर महाराष्ट्र

जिल्ह्यात "खरीप' कर्जवाटप तीन टक्केच! 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : यंदा दुष्काळाची भीषणता तीव्र असताना मॉन्सूनही लांबणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आत्तापर्यंत केवळ दहा हजार शेतकऱ्यांना अवघे तीन टक्केच कर्जवाटप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॅंकांची कर्जवाटपाबाबतची उदासीनता आणि कर्जमाफीच्या निर्णयाने जिल्हा बॅंकेकडील मोठी थकबाकी ही कारणे असल्याचे सांगितले जात आहे. 

यंदा संपूर्ण महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. जळगाव जिल्हाही त्याला अपवाद नाही. शिवाय, यंदा मॉन्सूनही आठवडाभर उशिराने येणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत दुष्काळामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने कर्जमाफी केली असली तरी पुढील पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसा उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. कर्जमाफीमुळे जिल्हा बॅंकेची थकबाकी मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. मागील कर्ज वसूल न झाल्याने यंदा कर्ज वाटप अत्यंत कमी झाले आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने कर्ज दिले जात नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक कोंडी झाली आहे. 

दहा हजार शेतकरीच पात्र 
जिल्ह्यात जिल्हा बॅंकेसह, राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि खासगी बॅंका मिळून 10 हजार 50 शेतकऱ्यांना आत्तापर्यंत केवळ तीन टक्केच कर्ज वाटप झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2936 कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना फक्त आतापर्यंत केवळ 85 कोटी 6 लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. 
 
असे झाले कर्ज वाटप 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला यंदा 1247 कोटींचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, बॅंकेने आजवर 6 हजार 970 शेतकऱ्यांना केवळ 33 कोटी 2 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तसेच राष्ट्रीयकृत बॅंकांना 1530कोटी 36 लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. पैकी या बॅंकांनी 2076 शेतकऱ्यांना केवळ 19 कोटी 94 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. ग्रामीण बॅंकांना 30 कोटी 92 लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. या बॅंकांनी 182 शेतकऱ्यांना अवघे 2 कोटी 22 लाख रुपये कर्जवाटप केले आहे. तर खासगी बॅंकांना 469 कोटी 27 लाखांचे उद्दिष्ट असताना या बॅंकांनी 1062 शेतकऱ्यांना 29 कोटी 88 लाख रुपये कर्ज वाटप केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: राजस्थानला तगडा धक्का! आक्रमक खेळणारा कर्णधार सॅमसन झाला बाद, शतकही हुकले

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT