उत्तर महाराष्ट्र

खानदेशच्या समृद्धीसाठी "मेगारिचार्ज'ला गती : खासदार रक्षा खडसे 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : खानदेशातील सिंचनाचे क्षेत्र वाढवून शेतीसमृध्दीसाठी आपला प्रयत्न आहे. त्यासाठी मेगा रिचार्ज या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्याचा आपला प्रयत्न आहे, त्याचा डी.पी.आर., रडार सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होऊन सिंचनात खानदेश तर समृद्ध होईलच परंतु विदर्भ आणि मध्यप्रदेशातील काही भागातील शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल असा विश्‍वास खासदार रक्षा खडसे यांनी "सरकारनामा'च्या फेसबुक लाइव्ह मुलाखतीत बोलताना व्यक्त केला. 
खानदेशातील महत्त्वाकांक्षी असलेल्या मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, तत्कालीन युती सरकारच्या काळात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा विचार समोर आला. नाथाभाऊ, हरिभाऊ जावळे आणि अलीकडच्या काळात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्पाचा पाठपुरावा केला. दोन वर्षांपूर्वी केंद्रीयमंत्री उमा भारती आणि नंतर मुख्यमंत्र्यांनीही या प्रकल्पाची हवाई पाहणी केली. योजनेचा रडार सर्व्हे पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. 

पाच लाख हेक्‍टर जमिनीस लाभ 
जळगाव जिल्ह्यासह विदर्भ, मध्य प्रदेशातील सुमारे 5 लाख हेक्‍टर जमीन या योजनेमुळे सिंचनाखाली येईल. मोठा प्रकल्प असल्याने त्याला पूर्ण व्हायला पाच-सहा वर्षेही लागतील. या योजनेचा डीपीआर बनविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून आगामी काळात ही योजनाच आपल्या मुख्य अजेंड्याचा विषय असेल, असेही श्रीमती खडसेंनी सांगितले. 


तरुणांशी साधणार संवाद 
तरुण हा देशाचे भविष्य घडविणारा घटक आहे. परंतु, राजकारणाबद्दल युवकांच्या मनात नकारात्मक भूमिका असल्याचे दिसते. ही भूमिका बदलण्यासाठी राजकीय नेत्यांनी त्यांच्यात जाऊन त्यांचे प्रश्‍न, समस्या जाणून घेतल्या पाहिजे. येत्या काळात आपण विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन, तरुणांचे मेळावे घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांच्या अपेक्षा जाणून घेत त्यावर कसे काम करता येईल, याचाही आराखडा तयार करू. सर्वच तरुणांना मोठ्या शहरांमध्ये जायचे आहे. मग, ग्रामीण भागात कोण काम करणार? त्यासाठी आपल्याच भागात तरुणांना चांगला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, ते आपण निश्‍चितपणे करू, असेही त्या म्हणाल्या. 


यशासाठी संघर्ष अटळ 
अनेकदा खडसेंची सून म्हणून खासदार झाल्याचे बोलले जाते, त्यावर आपली भूमिका मांडताना त्यांनी सांगितले की, खडसेंची सून म्हणून मी राजकारणात आली, हे खरे आहे. परंतु, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य व नंतर सभापती आणि आता खासदार असा प्रवास करताना व्यक्तिगत आणि राजकीय जीवनात इतरांना जसा संघर्ष करावा लागतो, तसा मलाही करावा लागला. कदाचित इतरांपेक्षा मला कमी त्रास झाला असेल, परंतु कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे तर खडसे कुटुंबातील सदस्य असो वा इतर सर्वांनाच संघर्ष करावाच लागतो. 


लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकणार 
लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना जिल्ह्यातील चित्र कसे असेल, याबाबत त्या म्हणाल्या, मोदी सरकारच्या कार्यकाळात चांगले व धाडसी निर्णय घेण्यात आले. या निर्णयांचा कदाचित त्रास झाला असेल मात्र दूरगामी चांगले परिणाम करणारे हे निर्णय आहेत. एकूणच सरकारची कामगिरी व कार्यकर्त्यांच्या जोरावर या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागांवर भाजपचा विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वास त्यांनी मुलाखतीच्या समारोपात व्यक्त केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT