live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

सोशल मीडियामुळे 23 वर्षांनी एकत्र आले मित्र-मैत्रिणी 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः तंत्रज्ञानामुळे आज जगात कोणतीच गोष्ट अशक्‍य नाही. याचे उदाहरण म्हणजे शालेय जीवनापासून दूर झालेले मित्र-मैत्रिणी तब्बल 23 वर्षांनी एकत्र आले. सोशल मीडिया या तंत्रज्ञानामुळे शक्‍य झाले आहे. यातून स्नेहमेळाव्याचे आयोजन करून यात साऱ्यांनी एकमेकांच्या सुख- दुःखात खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. 
सामनेर (ता. पाचोरा) येथील महात्मा गांधी विद्यालयाचे हे विद्यार्थी आहेत. नाशिक येथे एका रिसॉर्टमध्ये विद्यार्थ्यांचा शनिवारी (ता.14) स्नेहमिलन झाले. जळगाव, पाचोरा, नाशिक, मालेगाव, मुंबई, कल्याण, पुणे, दिल्ली व कोलकता येथे हे विद्यार्थी आपापल्या व्यवसाय व नोकरीत सक्रिय आहेत. यातील पाच जण सैन्यदलात देशसेवा बजावत आहेत. कोणी डॉक्‍टर, पत्रकार, "वर्ग-2'चे अधिकारी, खासगी नोकरी तर स्वत: चा उद्योग व व्यवसाय उभारला आहे. या स्नेहसंमेलनाला सामनेरच्या नयना अमृतकर, डॉ. योगिता पाटील, ज्योती सोनकुळ, योगिनी दुसाने, ज्योती पाटील (नांद्रा), भागवत पाटील (वडली), सुनील पाटील, रवींद्र पाटील, प्रदीप पाटील, रामचंद्र पाटील, सुनील भागवत पाटील, मुकेश शिंदे, योगेश पाटील, विलास पाटील (पाथरी), महेंद्र पाटील, स्वरूप पाटील, मनीषा पाटील, सीमा पाटील (लासगाव), सरला तायडे, हेमंत पाटील, निवृत्ती पाटील, दीपक पाटील, नितीन पाटील आदी उपस्थित होते. 

आदर्श निर्माण करण्याचा संकल्प 
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी समाजापुढे आदर्श निर्माण करण्याचा संकल्प केला. शालेय जीवनातील आपल्या प्रत्येक सहकार्याच्या सुख- दुःखात सहभागी व्हायचेच. शिवाय, संकटातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक व मानसिक मदत करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. एका मैत्रिणीने स्वत:वर बेतलेला प्रसंग जेव्हा कथन केला, तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू आले होते. शेवटी माणूसच माणसाच्या कामी येतो, याच उदात्त भावनेने संकटात मदत करण्याचा संकल्प करण्यात आला. 

असे आले मित्र एकत्र 
नाशिक येथे वास्तव्यास असलेल्या नयना अमृतकर आणि सैन्य दलात दिल्ली येथे कार्यरत असलेले सतीश पाटील दोघंही सामनेरचे रहिवासी. दोघांची 23 वर्षांनंतर योगायोग भेट झाली. यात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यातून 1996 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थ्यांचे मोबाईल मिळवण्यास सुरवात झाली. नयनाने मुलींचे आणि सतीश यांनी मुलांचे क्रमांक मिळविले. त्यातून सोशल मीडियाचा एक ग्रुप तयार झाला. नऊ महिन्यांच्या चर्चेनंतर स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेत शनिवारी हा कार्यक्रम झाला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

Udayanraje Bhosale : यशवंतराव चव्‍हाण यांना भारतरत्‍न द्या ; उदयनराजे, कऱ्हाडच्या सभेत मोदींना देणार निवेदन

MS Dhoni Cyber Scam : 'मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव...' धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान! Scam Alert

Loksabha Election: उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस? नाराजांना गळाला लावण्याचे भाजपकडून प्रयत्न

SCROLL FOR NEXT