solar panel.jpg
solar panel.jpg 
नाशिक

नाशिक परिमंडळात २८ वाहिन्या सौरऊर्जेवर; सौर प्रकल्पातून ६० मेगावॉट वीज कृषिपंपांना 

विनोद बेदरकर

नाशिक : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतून नाशिक परिमंडळात ६० मेगावॉटच्या सौर प्रकल्पातून २८ कृषी विद्युत वाहिन्यांद्वारे कृषिपंपांना आता दिवसा वीज मिळण्यास सुरवात झाली आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कार्यान्वित केलेल्या राज्यातील ५० पैकी २८ कृषी वाहिन्या नाशिक परिमंडलातील आहेत. 

सौर प्रकल्पातून ६० मेगावॉट वीज कृषिपंपांना 
शेतीला दिवसा आठ व रात्री दहा तास, असा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा होतो. रात्रीअपरात्री पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची होणारी अडचण टाळण्यासाठी राज्य शासनाने शेतीला दिवसा वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतून नाशिक जिल्ह्यात पाच ठिकाणी पाच मेगावॉटचे दोन म्हणजे एकूण दहा मेगावॉटचे, तर नगर जिल्ह्यात एक ठिकाणी पाच मेगावॉटचे दोन, असे एकूण सहा प्रकल्प उभारले. त्याची स्थापित क्षमता ६० मेगावॉट आहे. या सौर प्रकल्पातून तयार झालेली वीज महावितरण उपकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या कृषी वाहिन्यांना दिवसा मिळणार आहे. सकाळी सहा ते दुपारी दोन, सकाळी दहा ते सायंकाळी सहा आणि सकाळी नऊ ते सायंकाळी पाच, या वेळेचा समावेश असेल. 

सौर वाहिन्या 
जिल्ह्यातील टेंभे (ता. बागलाण) उपकेंद्रातील सहा, टिंगरी (ता. मालेगाव) उपकेंद्रातील पाच, वाहेलगाव (ता. नांदगाव) उपकेंद्रातील चार, राजापूर (ता. येवला) उपकेंद्रातील चार, दहिवड (ता. देवळा) उपकेंद्रातून पाच, तर नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जवळा विद्युत उपकेंद्रातील चार कृषी वाहिन्यांचा समावेश आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT