corona free
corona free esakal
नाशिक

दिलासादायक! येवला, दिंडोरी, इगतपुरी कोरोनामुक्त | Nashik

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : गेले दोन वर्ष कहर चालविलेल्या कोरोनाने (Corona) अखेर आपला गाशा गुंडाळला आहे.अर्थात चौथ्या लाटेची धास्ती अजूनही असून अशा भीतीच्या वातावरणातही येवला, बागलाण, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, मालेगाव, त्र्यंबकेश्वर जिल्ह्यातील हे सात तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. आजमितीस ६९ रुग्ण मात्र बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पहिल्या लाटेत मालेगाव, येवल्यात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. दुसऱ्या लाटेत नाशिक शहराला कोरोनाचा विळखा पडला तर जिल्ह्यातही येवला, सिन्नर, निफाड आदी तालुक्यामध्ये कोरोना आटोक्यात आणणे जिकिरीचे बनले होते. अशा परिस्थितीत दिवाळीपासून आशेचा किरण दिसला असून रुग्ण संख्या हळूहळू कमी होत गेली आहे. सद्यस्थितीत तर सात तालुके शून्यावर पोहोचल्याने प्रशासन, आरोग्य विभागासह नागरिकांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे. असे असले तरी काही देशात आलेल्या चौथ्या लाटेच्या उंबरठ्यावर भीतीचे वातावरण देखील असून यंत्रणेने चौथ्या लाटेची शक्यता व्यक्त केल्याने कोरोची दहशत मात्र अनेकांच्या मनात अजूनही घर करून आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार आत्तापर्यंत जिल्ह्यातील ४ लाख ७५ हजार ९९५ जण कोरोना बाधित झाले आहेत. यातील ४ लाख ६७ हजार कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत ६९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आत्तापर्यंत ८ हजार ८९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक ग्रामीणमध्ये येवला, बागलाण, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, मालेगाव, त्र्यंबकेश्वर हे तालुके कोरोनामुक्त झाल्याचा आनंद घेत आहे. नाशिक ५, चांदवडला १, देवळात १, नांदगावला १, निफाडला ५, पेठला २,सिन्नरला २, सुरगाणात ३ असे एकूण २० पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. नाशिक महानगरपालिका (NMC) क्षेत्रात ४६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ०० तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्ण असून असे एकूण ६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

रिकव्हरी रेट ९८ टक्के

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमधे ९७.५६ टक्के, नाशिक शहरात ९८.४८ टक्के, मालेगाव मध्ये ९७.३८ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.४५ टक्के. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण सरासरी ९८.१२ इतके आहे. कोरोनाने अनेकांचे बळी देखील घेतले आहे. आत्तापर्यंत नाशिक ग्रामीणमध्ये ४ हजार ३०४,नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार १०५, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून ३६४ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ८९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नियम धाब्यावर बसवू नका!

रुग्णसंख्या कमी होऊन एखाद-दोन बाधित निघत असल्याने नागरिकही आता बिनधास्त झाले आहेत. यामुळे कोरोनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवले जात असून कोणीही मास्क वापरताना दिसत नाही तसेच सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग, हात धुणे या पर्यायांचा देखील हळूहळू नागरिकांना विसर पडतो की काय अशीही भीती व्यक्त होत आहे. कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नसल्याने नागरिकांनी अधिकाधिक नियमांचे पालन करावे असे आवाहन येथील आरोग्य विस्तार अधिकारी राजेंद्र खैरे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT