Onion
Onion 
उत्तर महाराष्ट्र

कांदा ३०० ते ४५० रुपयांनी गडगडला

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - शेतकऱ्यांनी आवक नियंत्रणात ठेवल्याने क्विंटलला साडेतीन हजार रुपयांच्या आसपास सरासरी भाव राहील, अशी शक्‍यता तयार झालेली असताना २४ तासांत कांद्याचे भाव क्विंटलला ३०० ते ४५० रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या रोषाला राजकारण्यांना तोंड द्यावे लागणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

शेतीमालाच्या भावाची गंभीर परिस्थिती तयार झालेल्या भागातून शेतकऱ्यांच्या अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी दणकून यश मिळवले. त्यामुळे कांदा उत्पादकांचे दुखणे आताची निवडणूक कोणत्या टप्प्यावर नेणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कांद्याच्या विषयावर भूमिका मांडत हा विषय विरोधक लावून धरणार हे स्पष्ट केले होते. त्यामुळे विरोधकांना कांद्याचा विषय सत्ताधाऱ्यांनी आयता हातात दिल्याची स्थिती तयार झाली आहे. कांद्याच्या या वेळच्या दुखण्याचे दुहेरी अस्त्र सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तयार झाले आहे. शेतकरी नाराज आहेत. त्याच वेळी साठवणूक निर्बंधामुळे व्यापाऱ्यांनी नाराजी न मांडता बघ्याची भूमिका स्वीकारली आहे.
चांदवड बाजार समितीमधील क्विंटलभर कांद्याचे भाव तीन हजार शंभर रुपयांपर्यंत घसरलेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT