jowar well farmer savda
jowar well farmer savda 
उत्तर महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी ज्वारीची कणीस फेकली विहिरीत 

सकाळ वृत्तसेवा

सावदा : शहर व परिसरात आधीच अती पावसामुळे ज्वारी, कपाशी, सोयाबीन, मका पिके नष्ट झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापणी केलेली व खराब झालेली ज्वारीची कणीस चक्क बंद विहिरी मधे फेकून विल्हेवाट लावत आहे. तर काल रात्री बराच वेळ मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे उरला सुरला हंगाम ही आता हातातून गेल्यात जमा आहे. हाता तोंडाशी आलेला खरीप हंगाम पुरता नष्ट झाल्याने शेतकरी आणखीनच संकटात सापडला आहे. 
आज झालेल्या मुसळधार पावसामुळे तर उरला सुरला पुरता हंगामच वाया गेल्याने शेतकरी खूपच अडचणीत सापडला आहे. ज्वारी, कपाशी, सोयाबीन आदी पिके नष्ट झाली आहे. महसूल व कृषि विभागातर्फे पंचनामे करण्याचे काम सुरू असून आता पूर्ण नुकसान झाल्याने पंचनामे ही सरसकट करून शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक व बी बियाणे आदी मदत मिळाल्याशिवाय ते रब्बी हंगाम ची तयारी करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. 

एका डोळ्यात हसू तर दुसऱ्यात अश्रू 
यावर्षी अती पावसामुळे खरीप हंगाम नष्ट झाल्याने शेतकरी संकटात आहे. तर गेल्या तीन चार वर्षांपासून पाऊस नसल्याने भूजल पातळी खालावली आहे. त्यामुळे बागायत दार शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात होती. पण यावर्षी खूप पाऊस झाल्यामुळे नद्या नाले अनेक दिवस पासून वाहत आहे. त्याचा फायदा भूजल पातळी वाढीसाठी होत आहे अशी आशा शेतकरी बाळगून आहेत. अर्थात यावर्षी एकीकडे या पावसामुळे नुकसान तर दुसरीकडे भूजल पातळी वाढून पाणी समस्या मिटेल अशी आशा आहे. म्हणजे शेतकरी राजाच्या एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT