vinayak-mete
vinayak-mete 
उत्तर महाराष्ट्र

मराठा क्रांती मोर्चाद्वारे समाजाने एकत्र येऊन काय मिळवले? 

सकाळवृत्तसेवा

नाशिक - मराठा क्रांती मोर्चाची दिशा भरकटली असून, एकत्र येऊन समाजाने काय मिळवले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. या मोर्चामुळे मराठा समाजाची सामाजिक स्तरावर एकी झाली असली तरी राज्यात तोच मराठा समाज मात्र एकटा पडत चालला आहे. काही लोकांच्या चुकांमुळे तो टीकेचा धनी होत आहे. गावगाड्यात मोठा भाऊ, अशी भूमिका निभावताना मराठा समाज इतरांना आधार वाटायचा; पण आता ती जागा भीतीने घेतली आहे. याच भीतीमुळे त्याच्याविरोधात सर्व समाज एकत्र येत आहेत, अशा शब्दात शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी मराठा क्रांती मोर्चाबाबत सडेतोड भूमिका मांडली. 

आज येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आलेल्या मेटे यांनी पत्रकार परिषदेत शिवसंग्रामची भूमिका मांडली. सुरवातीला अरबी समुद्रातील शिवस्मारक, नवीन पक्ष आदी बाबींची माहिती दिल्यानंतर त्यांनी मराठा क्रांती मोर्चाबाबत आता धाडसाने बोलणे गरचेचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की इतिहासात असे मोर्चे निघाले नाहीत. समाजातील आबालवृद्ध या मोर्चांमध्ये सहभागी झाले. मात्र, या मोर्चांमुळे काय साध्य झाले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यभर निघालेला मराठा क्रांती मोर्चा सरकारने त्यांच्या पद्धतीने हाताळला. या मोर्चात नंतर काही लोक हेतू ठेवून सहभागी झाले व त्यांनी त्यांच्या पद्धतीने मोर्चा हाताळला; पण आता या मोर्चाची दिशा भरकटली आहे. मोर्चामुळे समाज एकत्र आला; पण आता पुढारी बेकीचा प्रयत्न करत आहेत. सामाजिक स्तरावर समाज एक झाला; पण राजकीय स्तरावर एक होणे शक्‍य नाही. तोच मराठा समाज आता राज्यात एकटा पडत चालला आहे. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांनी बसवलेली सामाजिक घडी विस्कळित होणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. 

लोक हेतू साध्य करण्यासाठी सहभागी 
मोर्चाला चुकीची दिशा कुणी दिली, याबाबत तुमचा रोख कुणाकडे आहे, असे विचारले असता ते म्हणाले, की लोकांना ते माहिती आहे. हे लोक आपापले हेतू साध्य करण्यासाठी या मोर्चात सहभागी झाल्याचाही आरोप त्यांनी केला. याबरोबरच अजूनही वेळ गेलेली नाही. काही भले करता आले नाही, तर किमान समाजाचे नुकसान तरी करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT