अनिल देशमुख
अनिल देशमुख  
विदर्भ

अनिल देशमुखांची जामिनावर सुटका

सकाळ वृत्तसेवा

काटोल (जि. नागपूर) :  शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात विविध आंदोलने करण्यात आली होती. या आंदोलनात पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. या सर्व सहा प्रकरणांत अनिल देशमुख यांच्यासह तब्बल 120 आरोपींची आज जामिनावर सुटका करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. मध्यंतरीच्या काळात बहुवार्षिक पीक योजनेतून संत्रा व मोसंबी वगळल्याने संत्रा व मोसंबीच्या नुकसानाची मागणी करीत आंदोलन केले. कोंढाळी राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने गतिरोधक लावण्यात यावे, यासाठी कोंढाळी येथे रास्ता रोको करण्यात आला होता. या सर्व आंदोलनांप्रकरणी विविध गुन्ह्यांची नोंद अनिल देशमुख यांच्यासह शेकापचे राहुल देशमुख व कम्युनिस्ट पक्षाचे भाई मधुकर मानकर यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 120 कार्यकर्त्यांवर करण्यात आली होती.
या सर्व प्रकरणांचे दोषारोपपत्र काटोल येथील न्यायालयाअंतर्गत काटोल व कोंढाळी पोलिसांनी दाखल केले होते. येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायमूर्ती मनोज चव्हाण व न्यायमूर्ती अनुप कुलकर्णी यांच्या न्यायालयात वरील प्रकरणी सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते. शुक्रवारी अनिल देशमुख यांच्यासह सर्व आरोपी न्यायालयात हजर होऊन जामिनाची मागणी केली होती. वरील सर्व प्रकरणांत न्यायालयाने सर्वांचा जामीन मंजूर केला. न्यायालयात सदर प्रकरणात आरोपींच्या वतीने ऍड. आनंद देशमुख, ऍड. रितेश बन्सोड, ऍड. भैरवी टेकाडे, ऍड. ऋतुजा गायकवाड यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT