विदर्भ

दक्ष मुख्यमंत्री व कटिबद्ध डीजी लक्ष देतील का? 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - पोलिसांच्या कल्याणासाठी तत्पर असेलेले मुख्यमंत्री आणि त्यांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी कटिबद्ध असलेले राज्याचे पोलिस महासंचालक असतानाही राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षेत पात्र झालेले 12 पोलिस कर्मचारी अजूनही पीएसआयपदाच्या प्रतीक्षेत आहेत. बढती मिळत नसल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. 

सध्या पोलिस महासंचालक दत्ता पळसलगीकर हे महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेनिमित्त नागपुरात आहेत. बुधवारी सायंकाळी मोठ्या थाटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धेचे उद्‌घाटन केले. तसेच पोलिसांच्या प्रत्येक समस्येचे निवारण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द त्यांनी उपस्थित तमाम पोलिस कर्मचाऱ्यांना दिला. दुसरीकडे 2013 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या अर्हता परीक्षेत उत्तीर्ण झालेले जवळपास 12 हजार पोलिस कर्मचारी पीएसआय पद केव्हा मिळेल? या आशेवर आहेत. राज्य पोलिस दलातील एवढा मोठा पोलिस वर्ग नैराश्‍याच्या गर्तेत जगत आहे. एमपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतरही त्यांना नियुक्‍ती दिल्या गेली नाही. पोलिस कर्मचाऱ्यांच्या या समस्येकडे मुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालक गांभीर्याने बघत नसल्यामुळे पोलिस दलात खदखद व्यक्‍त केली जात आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध फुटण्याच्या स्थितीत असताना मुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालक कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

किमान "मास्टर लिस्ट' लावा 
एमपीएससी अर्हता परीक्षेत उत्तीर्ण पोलिस कर्मचाऱ्यांची किमान "मास्टर लिस्ट' पोलिस महासंचालक कार्यालयाने घोषित करावी. जेणेकरून उत्तीर्ण उमेदवारांचे समाधान होईल. त्या यादीनुसार गृहमंत्रालयाने पोलिस उपनिरीक्षक पदावर नियुक्‍ती द्यावी. आतातरी पीएसआय पद मिळेल, अशी आशा ठेवून अजूनही केवळ कर्मचारी पदावर काम करणाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल. 

मंजुरीचे पत्रच मिळेना! 
माजी पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी गृहमंत्रालयाकडून 6 हजार पदे मंजूर करवून घेतली होती. गृहमंत्रालयाचे मंजुरी पत्र पोलिस महासंचालक कार्यालयात पाठविण्यात आले. तत्पूर्वी, 1 हजार 919 पीएसआयची पदे भरण्यात आली होती. पदे मंजुरीचे पत्र महासंचालक कार्यालयात पोहोचलेच नाही. त्यामुळे 12 हजार कर्मचारी अजूनही पद मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT