file photo
file photo 
विदर्भ

निधी परत गेल्याचा मुद्दा विधिमंडळात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषदेला विद्यार्थ्यांच्या गणवेशाकरिता दिलेला निधी परत गेल्याचा मुद्दा विधिमंडळात गाजणार आहे. सर्वांना गणवेश उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त असताना दिरंगाईमुळे अनेकांना ते देण्यात आले नसल्याने 24 लाखांचा निधी परत गेला आहे. 17 जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून हा मुद्दा विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर यांना तारांकित प्रश्‍नाच्या माध्यमातून मांडला आहे.
जिल्हा परिषदेच्या 1,534 शाळा आहेत. यात जवळपास 70 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेतील शाळांची पटसंख्या कमी होत आहे. अनेक प्रयत्न करूनही विद्यार्थी संख्येत वाढ होताना दिसत नाही. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी वर्ष 2018-19 मध्ये 4 कोटी 38 लाखांचा निधी मिळाला होता. यावर्षी शासनाने डीबीटी रद्द करून शाळा व्यवस्थापन समितीमार्फत विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्येक पात्र विद्यार्थ्यास गणवेश मिळणे आवश्‍यक होते. मात्र, काही विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नाही व गणवेशाचा 24 लाखांचा निधी शासनाकडे परत गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : ममता बॅनर्जी यांचा जाहीर सभेत कलाकारांसोबत डान्स

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT