चंद्रकांतदादा पाटील
चंद्रकांतदादा पाटील 
विदर्भ

चंद्रकांतदादा का बोलले नाहीत?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भाजपच्या संघटनात्मक बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. खासदार महोत्सवालाही त्यांनी नागपूरमध्ये हजेरी लावली. मात्र, पत्रकारांसोबत बोलण्यास नकार दिला. एरवी मीडियासाठी सहज उपलब्ध होणारे आणि सडेतोड वक्तव्य करणारे दादा का बोलले नाहीत? याचीच चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात होती. 

सध्या भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. त्याकरिता चंद्रकांतदादा पाटील नागपूरमध्ये आले होते. त्यांनी भाजप कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. रात्री खासदार महोत्सवालाही हजेरी लावली. त्यामुळे बैठकीत नेमके काय झाले, हे कळू शकले. भाजपच्या शहरातील इतर पदाधिकाऱ्यांनीसुद्धा बैठकीविषयी भाष्य करण्यास नकार दिला. राज्यात 105 आमदार असतानाही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. शिवसेना शेवटी येईल आणि भाजपच परत येईल, अशी सर्वांनाच आशा होती. मात्र, घडले उलटेच. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. दुसरीकडे भाजपतील ओबीसी नेत्यांच्या कुरबुरी बाहेर येऊ लागल्या आहेत. गुरुवारी दिवसभर भाजपचे बारा आमदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. त्यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्याही नावाचा समावेश होता. त्यामुळे वरिष्ठांवर भाजपचे नेते नाराज असल्याचे स्पष्ट दिसून येते. अद्याप कोणीही पक्ष सोडला नसला, तरी भाजपत सर्वकाही आलबेल आहे, अशी स्थिती सध्या नाही. या प्रश्‍नांची उत्तरे टाळण्यासाठी कदाचित चंद्रकांत पाटील बोलले नसावे, असा तर्क लावल्या जात आहे. 

पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी 
भाजपला सर्वाधिक फटका नागपूर जिल्हा आणि विदर्भात बसला आहे. जिल्ह्यात भाजपचे एकूण 11 आमदार होते. आता पाच शिल्लक राहिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात तसेच भंडारा, गोंदियातही भाजप झिरो झाली आहे. विदर्भात सुमारे 15 आमदार भाजपने गमावले आहेत. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. दुसरीकडे सत्ता स्थापन झाल्याने शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उत्साहित झाले आहेत. त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही यामुळे भाजपला फटका बसण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. भाजपतर्फे दुपारी बाराला सुरू झालेली बैठक रात्री दहापर्यंत चालणार असल्याचे सांगण्यात आले. विदर्भातील सर्व संघटन मंत्री नागपुरात आले आहेत. जिल्हानिहाय चर्चा केली जात आहे. प्रत्येक जिल्हाप्रमुखाशी चर्चा करून पराभवाची कारणे शोधून भविष्यातील नियोजन केले जात असल्याची माहिती आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT