विद्यार्थ्यांचे कागदपत्र क्वारंटाइन 
नागपूर

विद्यार्थ्यांचे कागदपत्र क्वारंटाइन

नीलेश डोये

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहांना क्‍वारंटाइन केंद्र करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना तात्काळ ते सोडावे लागले. काही दिवसच वसतिगृह क्वारंटाइन केंद्र राहणार असल्याच्या अपेक्षेने विद्यार्थी शैक्षणिक कागदपत्र येथेच सोडून गेले. विद्यार्थी गावी असून त्यांना या क्वारंटाइन केंद्रातच जाता येत नाही. कागदपत्राअभावी समोरील वर्षाच्या प्रवेशावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून पावसामुळे कागदपत्र खराब होण्याचा धोकाही व्यक्त करण्यात येत आहे. 
कोरोनाच्या नियंत्रणासाठी शासकीय इमारतीसोबत नागपूर विद्यापीठाचे वसतिगृहांना क्वारंटाइन केंद्र बनविण्यात आले. शाळा, कॉलेज बंद करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिृगह सोडण्यास सांगण्यात आले. पंधरा-वीस दिवसांचा वेळ काढायचा असल्याने विद्यार्थी आपले सर्व शैक्षणिक साहित्यासोबत कादगपत्र येथेच सोडून गेले. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांचे कागदपत्र दुसऱ्या रूममध्ये ठेवण्यात आलेत. संपूर्ण वसतिगृह क्वारंटाइन केंद्र असल्याने कोणत्याही व्यक्तीस येथे प्रवेशास मनाई आहे.

बहुतांश विद्यार्थी गावाकडे परत गेले आहेत. या विद्यार्थ्यांना येणे अवघड आहे. आता नवीन वर्षाचा अभ्यासक्रमासोबत प्रवेशाचा वेळ आला आहे. समोरील अभ्यासक्रमात प्रवेशासाठी कागदपत्रांची आवश्‍यकता आहेत. पावसाच्या पाण्यामुळे कागदपत्र खराब होण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. तसे झाल्याचे विद्यार्थ्यांनी घेतले शिक्षणच वाया जाण्याचा भीती व्यक्त होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली. यामुळे हे कागदपत्र विद्यार्थ्यांच्या नातेवाईकास देण्याची मागणी होत आहे. परंतु या विषयावर विद्यापीठ प्रशासन गंभीर नसल्याचे दिसते. 

विद्यापीठ प्रशासनाने याकडे लक्ष घालून लॉकडाउन शिथिलतेच्या काळात वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विशेष वेळ देऊन त्यांचे कागदपत्रे आणि इतर सामान घेऊन जाण्याची लवकरात लवकर परवानगी दिली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सहमतीनंतर कागदपत्र नातेवाईकास द्यावे, अशी मागणी मनपा आणि विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आली आहे. 
आशिष फुलझेले, प्रमुख, मानव अधिकार संरक्षण मंच. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT