cotton in water
cotton in water 
विदर्भ

विमा हवा, कापूस पावसात भिजू द्या! विमा कंपनी प्रतिनिधींचा शेतकऱ्यांना सल्ला 

नीलेश झाडे

धाबा (जि. चंद्रपूर) : अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान झाले. परंतु विमा कंपनीच्या नजरेत हे नुकसानच नाही. उलट पीक काढणीनंतर हातात आलेल्या शेतमालाचे नुकसान झाले तरच विम्याचा लाभ मिळेल. लाभ हवा असेल तर वेचणी झालेला कापूस पावसात भिजू द्या, असा संतापजनक सल्ला विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना देत आहेत. 

गोंडपिपरी तालुक्‍याला परतीचा पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. शेकडो हेक्‍टरमधील धानपीक जमिनीवर लोळले आहे. हातात येणाऱ्या पिकाचे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. सरकार मदत करेल ही आस त्याला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. परंतु अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने झालेले नुकसान खरे पाहता नुकसानच नाही, असे विमा कंपनी म्हणते.

गोंडपिपरी तालुक्‍यातील डोंगरगाव, अळेगाव येथील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीचा अर्ज देण्यासाठी विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे गेले असता रामटेके नामक प्रतिनिधीने अर्ज घेण्यास टाळाटाळ केली. कृषी सहायकाने "अर्ज घ्या' अशी विनंती केल्यावर त्या प्रतिनिधीने अर्ज स्वीकारले. हा प्रकार गोंडपिपरी पंचायत समितीच्या सभागृहात घडला. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून कृषी सहायकांनी पीक नुकसानीचा अर्ज विमा प्रतिनिधीकडे देण्याच्या सूचना शेतकऱ्यांना केल्या. 1 नोव्हेंबरला गोंडपिपरी तहसीलदारांनी पिकांच्या नुकसानीसंदर्भात तातडीची सभा घेतली होती. या सभेत विमा प्रतिनिधी उपस्थित होता. डोंगरगाव, अळेगाव येथील शेतकऱ्यांनी गोंडपिपरी येथील पंचायत समितीचे सभागृह गाठले. विमा प्रतिनिधी रामटेके यांना अर्ज देण्यासाठी गेले असता त्यांनी अर्ज घेण्यास टाळाटाळ केली असे शेतकरी सांगतात. सभागृहात उपस्थित कृषी सहायकाने अर्ज घेऊन घ्या, असे सांगितल्यावर त्या प्रतिनिधीने अर्ज स्वीकारले.

अतिवृष्टी, परतीचा पावसाने शेतमालाचे नुकसान झाल्यास विमाचा लाभ मिळत नाही. लाभ हवा असेल तर वेचणी झालेला कापूस पावसात भिजू द्या, असा सल्लाही त्या प्रतिनिधीने शेतकऱ्यांना दिला. यावर शेतकरी चांगलेच संतापले. दरवर्षी पीक विमा आम्ही भरतो. मात्र, कधीच नुकसानभरपाई मिळाली नाही. या पीक विम्याचा काय उपयोग, असा संतप्त सवाल करीत शेतकऱ्यांनी प्रतिनिधीला धारेवर धरले. 

नुकसान कसे करायचे? 
पीक विमा हवा असेल तर वेचणी झालेला कापूस पावसात भिजू द्या, असा सल्ला विमा प्रतिनिधीने शेतकऱ्यांना दिला. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतापले. हातात आलेल्या शेतमालाचे शेतकरी नुकसान करून घेईल काय, असा संतप्त सवाल त्यांनी प्रतिनिधीला केला. परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, असे उपस्थितांचे म्हणणे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर शुक्रवारी येणार आदेश

SCROLL FOR NEXT