सावनेर ः कंपनीच्या बियाण्यांनी फसगत झाल्यावरून पिकांची एकंदर स्थिती दाखविताना नुकसानग्रस्त शेतकरी.
सावनेर ः कंपनीच्या बियाण्यांनी फसगत झाल्यावरून पिकांची एकंदर स्थिती दाखविताना नुकसानग्रस्त शेतकरी. 
विदर्भ

पावसाने झोडपले, कंपनीनेही फसविले, तक्रार कुणाकडे? 

सकाळ वृत्तसेवा

सावनेर(जि.नागपूर) ः आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना यंदाच्या खरीप हंगामातही परतीच्या पावसामुळे शेत पिकांना फटका बसला आहे. कपाशी व सोयाबीन उत्पादकांचे कंबरडेच मोडण्याची यंदा दिसत आहे. तालुका कृषी विभाग, महसूल विभाग व पंचायत समिती विभागाच्या वतीने पीक नुकसानाचे पंचनामे अहवाल बनविणे सुरू असताना पावसाने तर तर झालीच, त्याचबरोर कपाशीच्या बियाण्यांमुळे फसगत झाल्याचा आरोप मंगसा गावातील अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. 

मागील वर्षी दुष्काळातही गावातील एक्‍सेल कंपनीच्या इक्को वाणाच्या बियाण्यांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी पंधरा क्विंटल कापसाचे उत्पादन झाल्याने उमरी गावातील व परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी फायदेशीर उत्पादनामुळे या वाणाची निवड केली. यंदाच्या खरीप हंगामात बियाण्यांची लागवड केली. लागवडीपासून संगोपनासाठी देखभाल व व्यवस्थापन केले. मात्र कपाशी उत्पादनाची स्थिती बघितली असता निदान लागवड खर्च तरी निघेल काय, या विवंचनेत सापडल्याची व्यथा मंगसा येथील शेतकरी सांगतात. 

कपाशीच्या झाडाला जवळपास निदान शंभर-दीडशे बोंडे तरी लागायला पाहिजे होती; मात्र कुठे चार, पाच तर कुठे आठ, दहा अशी बोंडे असून कपाशीवर चुरडा गेलेला आहे. त्यामुळे आता अधिक बोंडे लागणार नाहीत. आता फक्त कापसाच्या पऱ्हाट्या शिल्लक राहतील अशी स्थिती झाली असल्याचे शेतकऱ्याने काकुळतीला येत सांगितले. या स्थितीला कंपनीचे बियाणे जबाबदार असल्याचे शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पिकांची पाहणी केली. मात्र अद्यापही जबाबदार फिल्ड अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याचे शेतकरी म्हणाले. तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती येथील कृषी विभागाला बोगस बियाण्यांमुळे आमची फसगत झाल्याची तक्रार करणार असल्याचे मंगसा येथील समस्याग्रस्त शेतकरी शालिकराम रहाटे यांनी "सकाळ'ला सांगितले. 
शेतात पिकांची पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शालिकराम रहाटे, भागवत ढोपरे, मोरेश्वर चोरगडे, दयाल भजन, सुभाष रहाटे, तिलक चोरगडे, हेमराज धमदे, भुनीराज रहाटे, चंपत महाजन, संजय मुळे, गुलाबराव मुळे, ठाकरे, गोविंदा ठाकरे आदींसह मंगसा व उमरी येथील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT