File photo
File photo 
विदर्भ

संमेलनातील सहभागासाठी साहित्यिकांकडून "वसुली'!

सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : यवतमाळला होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या अनेक कवी व लेखकांकडून मोठ्या प्रमाणात वसुली करण्यात आली आहे. वऱ्हाडी कविसंमेलनात सहभागी होणाऱ्या बहुतांश कवींकडून प्रत्येकी 11 हजार रुपये घेण्यात आले आहेत. परिसंवादातील साहित्यिक व संचालकांनीही प्रत्येकी 11 हजार रुपये दिले असून, कवी कट्ट्यात सहभागी कवींकडून प्रत्येकी तीन हजार रुपये आकारण्यात आले असल्याचा दावा करून हे संमेलन सर्वार्थाने "प्रायोजित' असल्याचा आरोप शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी केला आहे.
या संमेलनात विदर्भातील अनेक नामवंत साहित्यिकांना डावलण्यात आल्याबद्दल पवार यांनी खेद व्यक्त केला. प्रख्यात वऱ्हाडी कवी प्रा. विठ्ठल वाघ, शेतकऱ्यांच्या समस्यांवर "गोष्ट छोटी डोंगराएवढी'सारखा चित्रपट लिहिणारे साहित्यिक-पत्रकार श्‍याम पेठकर, माधव सरकुंडे, अशोक पवार, डॉ. किशोर सानप, कवी हेमंतकुमार कांबळे यांच्यासह या भूमीतल्या अनेक गाजलेल्या साहित्यिकांना वगळण्यात आले असल्याचे सांगून, ज्या साहित्यिकांकडून संमेलनात सहभागी होण्यासाठी पैसे आकारण्यात आले त्यांच्यासाठी आता मानधन, प्रवासखर्च व निवास व्यवस्था करण्याची काय गरज काय, असा सवालही पवार यांनी केला.
विधवांची थट्टा कशाला?
संमेलनात काही आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्याचा निर्णय म्हणजे त्यांची क्रूर थट्टा करणे होय. वर्षभरात जिल्ह्यात सुमारे 248 शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यापैकी केवळ 40 आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे इतर 208 शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत साहित्य संमेलनाच्या माध्यमातून करावी, अशी मागणीही पवार यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT