देशात व राज्यात ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत, त्याचाच एक भाग म्हणून समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदियापर्यंत केला जाणार आहे.
गोंदिया - देशात व राज्यात ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत, त्याचाच एक भाग म्हणून समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदियापर्यंत केला जाणार आहे. नागपूर ते गोंदिया हे अंतर केवळ एका तासाचे असणार आहे. समृद्धी महामार्ग गडचिरोलीलासुद्धा घेऊन जाणार आहोत.
गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा लॉजिस्टिक कॉरिडॉर तयार करण्यात येणार असून, याचा खूप मोठा फायदा धान उत्पादक व निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. ९) येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
मनोहरभाई पटेल यांनी शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कार्य केले आहे. त्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळेच आज एक संपूर्ण पिढी शिक्षित झाली असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
केंद्र सरकारच्या नवीन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून एकविसाव्या शतकातील विकसित देश म्हणून भारत पुढे येत आहे. जगातील सर्वात चांगली अर्थव्यवस्था बनायचे असेल तर सर्वात महत्त्वाचे असते ते मनुष्यबळ आणि हे केवळ शिक्षण व कौशल्याच्या माध्यमातूनच तयार होते.
गावातील मुलांना उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण किंवा वैद्यकीय शिक्षण त्यांच्याच भाषेत घेण्याची सवलत केंद्र सरकारने दिली आहे असे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र सरकार उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण किंवा वैद्यकीय शिक्षण लवकरच मराठी भाषेत सुरू करणार आहे.
जी मुलं केवळ इंग्रजी येत नाही म्हणून उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण किंवा वैद्यकीय शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्यांना त्यांच्या भाषेत शिक्षण मिळणार आहे. यामुळे येणाऱ्या दिवसात देशाच्या मनुष्यबळ निर्मितीत सर्वात मोठे योगदान गावखेड्यातून आलेल्या तरुणाईचे असेल. प्रास्ताविक खासदार प्रफुल्ल पटेल यांनी, तर संचालन माजी आमदार राजेंद्र जैन व आशावरी देशपांडे यांनी केले.
हम आये तो चर्चा होती रहेगी
आपल्या येथे आल्याने राजकीय क्षेत्रात चर्चांनाही उधाण आले असणारच, हम आये तो चर्चा होती रहेगी, दूर तक भी जायेगी. लेकीन महाराष्ट्र में हम राजनितीक लोग चुनाव के वक्त सिर्फ राजनिती करते है, बाकी वक्त तो हम सब दोस्त के रुप मे ही एक-दुसरे के यहा आया जाया करते है. इसलिये हमारे आने की चर्चा औऱ भाईजी के मिलाप की चर्चा यहा ही नही तो वह तो उपर तक भी चलेगी, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.