याप्रसंगी "मी माईची वेडी' या पुस्तकाचे मुखपृष्ठ व "आठवणीतील शाळा' काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी "मी माईची वेडी' या पुस्तकाचे मुखपृष्ठ व "आठवणीतील शाळा' काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.  
विदर्भ

सिंधुताई सपकाळ म्हणतात, अडाणी व्यक्‍तीही ध्येय्य गाठू शकतो

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शिक्षित व्यक्‍तीच सारेकाही करू शकतो असे समजू नका, तर अडाणी असलेल्या व्यक्‍तीही आपले ध्येय्य गाठू शकतो. माणूस कधीही वाईट नसतो. जगण्यात आव्हाने येतच असतात. जीवनाच्या प्रवासात काटे रुतले तरी थांबू नका, चालत राहा, यश तुमचेच आहे, असा प्रेमळ सल्ला ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी दिला.

बुधवारी माई कट्टा महाराष्ट्र राज्य साहित्य प्रतिष्ठानचे उद्‌घाटन सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते सुरेश भट सभागृहात झाले. माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान, सेवाकृत बहुउद्देशीय संस्था, महर्षी मार्कंडेश्वर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी "मी माईची वेडी' या पुस्तकाचे मुखपृष्ठ व "आठवणीतील शाळा' काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार सुनील कुहीकर, सविता मोहन मते, ग्रामगीताचार्य अनिल पिट्टलवार, माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे विश्वास महादुले उपस्थित होते.

माणसे शिकतात कशासाठी

माणसे शिकतात कशासाठी असा प्रश्‍न उपस्थित करत सुनील कुहीकर यांनी लहान गोष्टीतून आपले मत व्यक्‍त केले. माणसाच्या आचरणाने त्याची शैक्षणिक पात्रता सिद्ध व्हायला हवी. अंगावरचे कपडे, दागिने आणि त्याच्या राहणीवरून माणसाची पात्रता ठरत नाही. समाजातील आपले वर्तन सिद्ध व्हायला हवे. प्रत्येकाने माणसे जोडण्याचे शिक्षण घ्यावे. विचारांचे परिवर्तन होईल, असे माणसाने व्हावे असे आवाहन सुनील कुहिकर यांनी केले. राष्ट्रसंतांनी प्रत्येक माणसात देव शोधला. हाच देव बघायचा असेल तर प्रत्येकाने ग्रामगीतेचे वाचन करावे, असे अनिल पिट्टलवार म्हणाले.


72 दिव्यांनी सुवासिनींनी केले औक्षण

सविता मते यांनीही मनोगत व्यक्त केले. सीमा राऊत पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अशोक पवनीकर, नीना निनावे, भाऊराव कोसे, माधुरी पांडे, डी. बी. महाजन या ज्येष्ठांसह अनेक महनीयांचा सत्कार करण्यात आला. सिंधुताई सपकाळ यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त 72 दिव्यांनी सुवासिनींनी औक्षण केले. प्रा. मीना उपाध्ये यांनी स्वागतगीत म्हटले. संचालन विजय जत्थे यांनी केले.


कष्टाशिवाय पर्याय नाही. कोणीही वाईट नसतो. डोळे उघडून आयुष्याकडे बघा, चांगल्या गोष्टीचा स्वीकार करा. प्रयत्न, जिद्द, जिज्ञासा, निर्धार असेल तर माणूस काहीही करू शकतो. कुटुंबाने कर्त्याला जगण्याचे बळ द्यावे. मोठ्या मनाने प्रत्येकाने शिका असा सल्ला देताना ही संतांची शिकवण असल्याचे कायम लक्षात ठेवा.
- सिंधुताई सपकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT