Amravati News
Amravati News sakal
विदर्भ

मालखेड तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, भातकुली तालुक्यातील आष्टी येथील रहिवाशी

सकाळ वृत्तसेवा

सावंगा विठोबाच्या जत्रेसाठी कुटुंबासह आलेल्या दोन युवकांचा मालखेड तलावाच्या खालच्या भागात आंघोळीसाठी गेल्याने गाळात अडकून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. १७) दुपारी घडली.

भातकुली तालुक्यातील आष्टी येथील रहिवाशी निखिल अनंतराव खरसान (वय २४) व प्रणव सुरेश पायतळे (वय १८) हे आपल्या कुटुंबासोबत सावंगा विठोबाच्या दर्शनासाठी आले होते. याठिकाणी कुटुंबीयांनी स्वयंपाक केला होता. जेवणाआधी निखिल, प्रणव व त्यांचे दोन मित्र मालखेड तलावाच्या खालच्या भागात आंघोळीसाठी गेले होते.

निखिल व प्रणव हे दोघे तलावात आंघोळीसाठी शिरले. मात्र ते वर न आल्याने मित्रांनी त्याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी ही माहिती चांदूररेल्वे पोलिसांना सांगितली.

पोलिसांनी तत्परता दाखवत घटनास्थळ गाठले व तलावात पाणी जास्त असल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी जिल्हा शोध व बचाव पथकाला पाचारण केले. काही वेळातच दोन्ही युवकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोघांनाही शवविच्छेदनासाठी चांदूररेल्वे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

पुढील तपास पोलिस निरीक्षक अजय अहिरकर यांच्या नेतृत्वाखाली हेडकॉन्स्टेबल शिवाजी घुगे व नितीन शिंदे करीत आहेत. तलावातून मृतदेह काढण्यासाठी जिल्हा शोध व बचाव पथकाचे सचिन धरमकर, दीपक पाल, दीपक दोरस, गजू वाडेकर, गणेश जाधव, पोलिस पाटील हिरासिंग राठोड यांनी सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma : MI चा पराभव मात्र टीम इंडियाला दिलासा! शेवट गोड लखनौनेच केला

मुलं हवीत की ‘रील स्टार’?

मानवी अस्तित्वाचा वास्तव शोध!

महिला धोरणांचा प्रवास

अनुभवात्मक शिक्षण हवेच!

SCROLL FOR NEXT