विदर्भ

विदर्भ, मराठवाड्यात 19 आॅक्टाेबरपासून आंदाेलन : राजू शेट्टी

सकाळवृत्तसेवा

बुलडाणा : दुष्काळामुळे शेतकरी हाेरपळून गेला असून, शासनाचे डाेके ठिकाणावर आणण्यासाठी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे 19 आॅक्टाेबरपासून विदर्भ, आणि मराठवाड्यात आंदाेलन छेडण्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी अाज (मंगळवार) येथे पार पडलेल्या साेयाबीन-कापूस परिषदेत दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साेयाबीन-कापूस परिषदेचे आयाेजन बुलडाण्यात करण्यात आले हाेते. विदर्भातील साेयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नांना वाचा फाेडण्यासाठी आयाेजित या परिषदेला खासदार राजू शेट्टी, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांसह पदाधिकारी उपस्थित हाेते. यावेळी खासदार शेट्टी यांनी शासनावर सडकून टीका केली. ते म्हणाले, महात्मा गांधींना नावे ठेवणारे आज सत्तेत आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळ्याच्या आगीत हाेरपळत आहे. पण शासनाला पाझर फुटत नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी 19 आॅक्टाेबरपासून तीव्र आंदाेलन छेडण्यात येईल. दुष्काळाची झळ पाेहचलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

माेदी सरकारच्या धाेरणामुळेच अर्थव्यवस्था काेलमडली आहे. पिकाचे भाव घसरले आहेत. शेतकरी पीक विमा योजना ही शासनाच्या तिजोरीवर टाकलेला दरोडा आहे. ही योजना पंतप्रधान कॉर्पाेरेट योजना असून परदेशातून आयात केलेला माल आणि ही कॉर्पाेरेट योजना उद्योजकांच्या भल्यासाठीची योजना आहे. त्यामुळे देशासाठी हे संकट असल्याचेही त्यांनी म्हटले. सोयाबीनसह, बोंडअळीमुळे गेल्या वर्षी झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू करावेत, यासह विविध मागण्यांसाठी दसऱ्यानंतर विदर्भ-मराठवाड्यात चक्का जाम करून सोयाबीन-कापसाच्या भावासाठीच्या निर्णायक लढा उभारण्याचा इशाराही खासदार शेट्टी यांनी दिला. लाच घेण्याऱ्या अधिकाऱ्यांना ठाेकून काढा, असे आवाहनही त्यांनी केले. गर्दे वाचनालयाच्या सभागृहामध्ये सोयीबन-कापूस परिषद आयोजित केली होती.

यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, प्रा. डॉ. प्रकाश पोफळे, माजी मंत्री सुबोध मोहिते, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिता ढगे, चंद्रशेखर साळुंके, साईनाथ अण्णा, मारोती वर्हाडे, शर्मिला येवले, दामोधर इंगोले यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : इशान किशन अन् नेहलनं डाव सावरला

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT